॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय

वीरभद्राबरोबर मच्छिंद्राचे युद्ध; स्वर्गलोकी सन्मान; वज्रावतीचे दर्शन. १६९ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजयाजी पंकजाक्षाकमलापते कमलपत्राक्षाअवगुणरुपा गुणसर्वेशामहादक्षा रघुत्तमा
हे कमळमित्रकुळभूषणारावणांतका रघुनंदनापुढें बोलवीं ग्रंथरचनाजेणें श्रोतयां सुख वाटे
मागिले अध्यायीं कथा सुरसकाळिका देवी मच्छिंद्रासप्रसन्न होऊनि वरदानाससाबरीविद्या आतुली
तेथूनि आला हरेश्वरासीगदातीर्थस्नानउद्देशींस्नान करुनि पर्वतासीप्रदक्षिणा आरंभिली
सर्वेचि येतां मच्छिंद्रनाथतों वीरभद्र पातला स्नाना तेथमानववेषी जोगी कृत्यत्रिशूळ डमरु धनुष्यादि
शैली शिंगी नाद अदभुतनाद नोहे तो आंगम व्यक्तसाधकहिताचा स्वार्थअर्थपरिणाम सूचवी
अहो ती शिंगी नोहे देवतासाधकजनांची कामदुहितापूर्ण करावया परिणाम अर्थाबोधरवि प्रवेशती
रज तम सत्त्व तृतीय गुणमहामारक अति कठिणते त्रिवर्ग करिती खडतरपणऐक्य केला त्रिशूळ तो
यापरी आगमनिगमबीजेंसारव्यक्त तेजापुंजेंतयाची पंथिका दावी करांबुजेविशाळ डमरु विराजला
सगुणकथा सप्तधातुगुणीं भरला गुणातीतुनवरंगरसांत झाला व्यक्तुहरिगुणींचि भक्तु होईना कां
१०
कामक्रोधषडगुणविकारसत्त्वस्थाचे शत्र अनिवारतयां जिंकितां विवेक फारशरगांडीव विराजलें
११
अहो शर नोहे ते जाण युक्तीकामक्रोधांतें देत मुक्तीगांडीव नोहे तें विषयभक्तीज्ञानशरीं विराजलें
१२
अगा शर न म्हणूं ते ज्ञानदिवटीअज्ञानतमींचें मनीं वीरभद्र येतसे स्नानालागूनतों मार्गी मच्छिंद्रातें पाहूनउभा केला हटकोनी
१५
करुनि उभे नमनानमनम्हणे स्वामी तुम्ही कोणयेरु म्हणे मच्छिंद्र अभिघाननिजदेहा मिरवीतसे
१६
येरु म्हणे कवण पंथींअभ्यास मिरवितसां जगाप्रतीमच्छिंद्र म्हणे जोगीये नीतीनाथपंथीं मिरवीतों
१७
येरु म्हणे कोण दर्शनमच्छिंद्र म्हणे जोगीमहिमानशैली कंथा मुद्रा भूषणनिजाअंगीं मिरवीतसें
१८
वीरभद्र म्हणे मुद्रा सानन घालितां फाडिले कानयेरु म्हणे गुरुप्रसादें करुनमंथनीं निर्मिला हा एक
१९
वीरभद्र म्हणे काय पाखंडव्यर्थचि उगलें वाढवूनि बंडजगामाजी मिरवितां काळें तोडयोग्यायोग्य दिसेना
२०
तरी आंता योगद्रुमामुद्रा सोडीं ह्या नसती उत्तमानाहीं तरी शिक्षा पावसी नेमाठाई ठाई महाराजा
२१
अगा तव गुरु ऐसा कोणवेदविधिच्या प्राज्ञेंकरुनपूर्ण आगळीक पंथ निर्मूनजगामाजी मिरवितो
२२
अगा स्वबुद्धी तर्क करुनभलतेंचि मत करी स्थापनतो प्राज्ञिक नव्हे मुर्खाहूनशतमूर्ख म्हणावा
२३
ऐसी ऐकतां भद्रगोष्टीमच्छिंद्र संतप्त झाला पोटींम्हणे मशका खाटीवल्गना करिसी अपार
२४
अरे शतमुर्खाहूनि मूर्खम्हणूनि बोलसी दुःखदायकपरमात्मा क्षोमवूनि पातकभार वाहिला निजमौळी
२५
अरे आत्मा क्षोभतां पराचापापभार होत ब्रह्मांडींचातस्मात् तव गुरु कैंचादुजा गुरु विलोकीं
२६
अरे नष्टा दुर्जन अधमातव दर्शने स्नान करणें आम्हांआतां उगाचि जाय आपुल्या कामाशिक्षा पावसील मम हस्ते
२७
ऐशापरी मच्छिंद्रनाथाचें भाषणऐकतां वीरभद्राचें क्षोभलें मनम्हणे भ्रष्टा तुझा प्राणआतांचि घेईन ये काळीं
२८
मग करीं कवळूनि सायकासनसत्वर रगडूनि लाविला गुणनिर्वाण अर्धचंद्र बाणतूणीरांतूनि काढिला
२९
तें पाहूनिं मच्छिंद्रनाथम्हणे पतित झालासी उन्मत्तअरे उद्धटा आपुलें अहितजनांमाजी मिरविसी
३०
अरे सायकासन सिद्ध करुनसोंग दाविसी मजलागूनपरी हें बरवें नोहे मरणये काळीं पावसी
३१
अरे ऐसें सोंग मजकारणकित्येक झाल अवलोकूनबहुरुप्याचें खडतरपणशूरत्व रणीं मिरवेना
३२
कीं अजाकंठींचे लंबस्तनपरी नातुडे त्यांत दुग्धपानतेवीं तूं दाखविसी हावभाव करुनपरी क्षणैक क्षीण होसील कीं
३३
वीरभद्र म्हणे मूर्खा एकतूतें दावीन यमलोकतव आयुष्य सरलें सकळिकम्हणूनि येथें आलासी
३४
तरी मी तूतें काळक्षयप्रगट झालों आहें प्रत्यक्षतरी तव गुरु प्रतापदक्षकैसा आहे पाहूं दे
३५
मच्छिंद्र म्हणे मशकासाठीमेरु मिळवील काय नगांची कोटीकीं महाक्षीराब्धी घेऊनि नरोटींभीक मागेल पोटातें
३६
मूर्खा ऐक वचनार्थमम गुरुचा मौळीं वरद हस्ततेणें होतसे शरणागतमानव दानव देवादि
३७
तेथें अर्मका तुझा पाडकिमर्थ आधीं मिरविसी कोडमहासविता तप्त उजेडखद्योतातें मिरवेना
३८
वीरभद्र म्हणे तूं काय करिशी मरणकाळीं फांटा फुटला तुजसाआतां क्षणोंचि भूमीपाशींकरीन नव्हतासि ऐसें
३९
अरे तव ग्रीवेतें काळपाशआधींच पावलें आयुष्य नाशम्हणूनि मूर्खा तूतें हौसये वादा स्फुरलासी
४०
ऐसें म्हणूनि वीरभद्रानेंगुणीं सज्जिलें अस्त्रविंदानम्हणे भ्रष्टा सावधानराममंत्र जल्पीं कां
४१
मच्छिंद्र म्हणे राममंत्रतूतें वाटला अपवित्रपरी तेणोंचि सुखी पंचवक्रदुःखलेशी मुकलासे
४२
अरे राममंत्रें वाल्या तरलातें नाम तारील आतांचि मजलापरी सावध तूं होई कां वहिलाराममंत्रावेगळा
४३
ऐसें म्हणूनि कक्षे झोळीविलोकूनि भस्म करीं कवळीमग शस्त्रास्त्रीं तेणें काळींवज्रस्थापना जल्पतसे
४४
पूर्ण प्रयोग घालूनि धाटींभोंवती फिरवी भस्मचिमुटीतेणें करुनि वज्रदाटीदाही दिशा मिरवीतसे
४५
आणीक करीं कवळूनि भस्मयासी विलोकी योगद्रुमतों वीरभद्रें सायकें परमनिर्वाण बाण सोडिला
४६
तो बाण येतां किंकाटतदृष्टीं पाहे मच्छिंद्रनाथमग आपुले मानी मनांतबाण आहे तृणासम
४७
ऐसें म्हणूनि स्तब्धदृष्टीउभा करीं कवळूनि भस्मचिमुटीतवं तो बाण नभापोटींसंचरुनि उतरतसे
४८
मच्छिंद्रनाथातें लक्षूनखालीं उतरतसे घ्यावया प्राणतों सबळ बळें वज्र येऊनप्रहार करितें पैं झाले
४९
तरी तें वज्र वरिष्ठआदळतांचि बाण झाला पिष्टतें पाहूनि वीरभद्र वरिष्ठपरम चित्तीं क्षोभला
५०
मग शक्तिअस्त्र देदीप्यमानयोजिता झाला रुद्रनंदनसज्ज करुनि सायकसंधानसाधूनियां प्रेरिलें
५१
सर्वेचि काढूनि दुसरा बाणनागास्त्र तयावरी स्थापूनतोही चुंबीत पावला गगनपाठोपाठ शक्तींच्या
५२
परी ती शक्ती बलाढ्य बहुतस्वर्गी मिरवे शब्द करीतऐकतां शब्द भयभीतसकळ मही झाली असे
५३
दिग्गज पळती रानोरानशेष न ठेवी आपुली मानवराह पाहूनि अति निर्वाणदंतानें मही सरसावी
५४
कूर्म करीतसे सबळ पृष्ठीपाहूं पातले देव विमानदाटींतेही पाहूनि कपाटपोटींसंचरुनि पळताता
५५
देवविमानीं हडबडपाहूनि उडुगण पळती पाडसोडूनि आपुले कार्य उघडनभामाजी सरळले
५६
देव मानव यक्ष दैत्यम्हणती पावला प्रळयमृत्युही शक्ति नोहे प्रळय समस्तमही बुडवील वाटतसे
५७
सबळ बळिष्ठ ती मही कांपततेणें नगकडयांची खांचणी होतमायलेक चुकुनि निश्वितरुदन करिती हंबरडे
५८
सहस्त्र विजूंचा कडकडाटदावूनि शब्द अनिवारलोटनभमंडळ पाहूनि नीटशक्ती भेदिली वज्रातें
५९
तेणें वज्र अति क्षीणहोऊनि पडलें गगनाहूनपुढें मच्छिंद्राचा लक्षूनि प्राणहरावया येतसे
६०
यावरी नागास्त्र निःशक्ततें पाहूनि मच्छिंद्रनाथत्वरें कवळूनि भस्म चिमुटींतरुद्रास्त्र प्रेरीतसे
६१
त्यासवोंचि योजूनि खगेद्र अस्त्रांतपाठोपाठीं प्रेरीतपरी रुद्रास्त्र झालें व्यक्तरुद्र एकादश प्रतापी
६२
एकादशरुद्रचूडामणीशक्तीतें तल्लीन करी कवळूनीतेणें हस्त पाद मूर्धनीक्षीण हाऊनि पडियेली
६३
शक्ती पडतां खचूनि महींरुद्र मिरवले अदृश्य देहींयेरीकडे खगेंद्र अहीअस्त्रा अस्त्र भक्षीतसे
६४
तेणें नागास्त्र त्वरितअदृश्य झालें युद्धरहितयावरी अस्त्र विनतासुततेंही झालें अदृश्य
६५
यावरी वीरभद्र प्रतापतरणीवातास्त्र प्रेरिता झाला गगनींतें मच्छिंद्रनाथ विलोकुनीपर्वतास्त्र सोडितसे
६६
तेणें कोंडिला अवघा वातमग वज्रास्त्र प्रेरी महारुद्रसुततेणेंकरुनि चूर्ण पर्वतअदृश्यपणीं मिरवला
६७
यापरी प्रतापी वीरभद्र त्वरितप्रेरिता झाला अग्न्यस्त्रते पाहूनि मच्छिंद्रनाथजलदास्त्र प्रेरीतसे
६८
त्यानें सकळ अग्नि विझवूनकरितें झालें अदृश्य गमनयावरी वीरभद्रें कामास्त्र सोडूनकामव्यथा योजीतसे
६९
त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्रप्रेरिता झाला रत्यस्त्रतेणेंकरुनि काम पळतसुख पावला रतिसंगें
७०
यावरी वीरभद्र दक्षप्रेरिता झाला महोरगास्त्रतें पाहूनि मच्छिंद्रनाथसंजिवनी प्रेरितसे
७१
वीरभद्र तो वैश्वानरप्रेरिता झाला दानवास्त्रमच्छिंद्रनाथ अति तत्परदेवास्त्र प्रेरितसे
७२
मग अस्त्र तें बळवंतदेव दानव प्रगटले अमितते पाहूनियां उभयतांतेंस्वग्रीवा तुकविती
७३
परस्परें धन्य धन्यवदोनि हदयीं करिती मानगदगदोनि हास्यवचनएकमेका बोलती
७४
वीरभद्र म्हणे सकळे महींवीर जिंकिले भद्रयुद्धें प्रवाहीपरी सच्छिंद्रा तुजसमान ये देहींदेखिला नाहीं कोणीच
७५
मच्छिंद्र म्हणे वरदहस्तपुढें पहा भद्रजातयेरी म्हणे अविनाशवंतगुरु आहे माझा कीं
७६
वीरभद्र तुकावूनि मानम्हणे गुरु तुझा आहे प्राज्ञआणि तूंहि त्यांत अससी धन्यप्राज्ञीकवंत सद्यशा
७७
ऐसें देवास्त्र युक्तप्रयुक्तदानव वरुनि सकळ शांतअदृश्यपणीं स्वस्थानांत जाऊनियां पोचलें
७८
यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्रप्रेंरिता झाला अति पवित्रतें पाहूनियां वरदपात्रविध्यस्त्र प्रेरितसे
७९
तें प्रगटतां चतुभुंजमूर्तीविधी लागे चरणाप्रतीयावरी कार्तिकास्त्र भद्रजातींसोडिता झाला तत्क्षणीं
८०
तें पाहूनियां दत्तवरदपाणीस्त्रीअस्त्र सोडित गगनींतें बोलतां लावण्यखाणींस्वामीलागी विहिताती
८१
तणेंकरुनि कार्तिकास्त्रतत्क्षणीं पावलें शांतयावरी भद्र तो काळास्त्रप्रेरिता झाला तत्क्षणीं
८२
तें पाहुनि मच्छिंद्रनाथमायाप्रळयी प्रेरिलें अस्त्रतेणें काळ भक्षूनि पवित्रपंचतवकवळीतसे
८३
तें पाहूनि सकळ देवकरितें झालें मच्छिंद्रस्तवम्हणती महाराजा युगभावसकळ नाश पावेल कीं
८४
म्हणती महाराजा कलिभागपुढे आहे अनंतयुगतों आजि तुम्ही सकळ यागविनाशरुपी पाहतां कीं
८५
तरी आतां कृपा करुनमायाप्रळय घ्या आवरुनमग देववाणी श्रवणीं ऐकूनवासनीक अस्त्र प्रेरितसे
८६
तेणें मायाप्रळय हरलामायाउत्पत्तिप्रयोग राहिलामग सकळ विमानें उतरुनि महीलादेव नमिति मच्छिंद्रा
८७
ब्रह्मा विष्णु आणि रुद्रस्तवनें केला शांत मच्छिंद्रमग संनिध बोलावूनि वीरभद्रकरीं कर ओपिती
८८
म्हणती कविनारायण मच्छिंद्राथतरी आपण होऊनकीं मच्छिंद्राची कामना कोणती मीच पूर्ण करीनवरदचित्तेंकरुनिया
९०
धन्य आहे मच्छिंद्रनाथयुद्धीं कुशल प्रतापवंतधन्य श्रीगुरु मिळाला त्यातेंप्रतापवंत आगळा तो
९१
मजसमान युद्धनेमींपातलों यासी युद्धभूमींपरी न देखों युद्धसंगमींमच्छिंद्रासमान पुरुषार्थ
९२
म्यां पूर्वी रावण बळी भांडोनसुखें देवीवर रणीं आणूनिकिन्नर गंधर्व थकित जाणनाहीं पुढें ठेले मम युद्धीं
९३
कल्पांतभैरव मातें नामदेते झालें सुरासुर उत्तममाझें जिंकावया युद्धकर्ममिळाला नाहीं कोणीच
९४
परी आजी खातरी कृत्याकृत्यकेली असे मच्छिंद्रनाथेंमग करी कवळूनि हदयातेधरिता झाला सप्रेम
९५
म्हणे महाराजा योगद्रुमावेधक कामना असेल तुम्हीतरी ती सांगूनि रुदीत्तमावरदसुखा पहुडवीं
९६
येरु म्हणे बा महाराजाएक अर्थ तूं करुनि माझापरी त्यातें फळ देऊनिया जालोकोपकारीं मिरवावें
९७
जैसे एक वायूचे आधीन यथार्थवर्षाकाळीं मेघ वर्षे जलातेंतेणें तुष्ट होय क्षितींतचराचर अवघेंही
९८
तन्न्यायें कामना चित्तींविकार सांडी वरली मतीतरी कार्यगंधाच्या बैसोनि अर्थीलोकोपकारीं मिरवावें
९९
तरी तो अर्थ म्हणाल कोणमहाराजा करा श्रवणम्यां कामनी वरिला विद्याकामसाबरीविद्या महाराजा
१००
तरी त्या मंत्रबोलासमानआपण वहिवाटा ये देहीं धर्मत्वरें जाऊनि जगाचा काममंत्रापाठीं पुरवावा
१०१
एवं वर ओपूनि मातेंलोट लोटवा कृपासरितेमग अवश्य म्हणे मच्छिंद्रातेंकार्य सहसा करीन मी
१०२
ऐसें बोलूनि वरदयुक्तीकरतळा देत प्रसन्नचित्तींयापरी सकळ देव बोलतीप्रसन्न होऊनि तयातें
१०३
म्हणती वीरभद्रें दिधला वरतया साह्य असों आम्ही समग्रमंत्रपोटीं कार्य थोरआम्ही करुं सहसाही
१०४
ऐसें बोलूनि वरदयुक्तीमग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वाप्रतीरुद्र ब्रह्मा चक्रवर्तीभावेकरुनि नमियेला
१०५
विष्णुपदीं ओपितां मौळीतोही त्याते कृपें न्याहाळीपरम प्रेमें हदयकमळींधरिता झाला स्नेहाळ तो
१०६
म्हणे वत्सा पूर्णकोटीजेथें पडतां जीव संकटींमाझें स्मरण करितां ओंठींदृश्य होईना त्या ठाया
१०७
दृश्य होतां संकटराशीनिवारीन मी निश्वयेंसीमग चक्रअस्त्र देऊनि त्यासीतुष्ट मानसीं केला तो
१०८
यापरी नंदीश उमानाथतोही प्रसन्न होऊनि त्यातेंप्रेमें कवळूनि हदयातेंत्रिशूळास्त्र ओपितसे
१०९
यापरी नाभितनया नमितांतोही वदे प्रसन्नचित्ताशापादपि सवितासंजोगिलें तयासी
११०
जें वाणीनें निघे अक्षरतें होय साचोकारशुभाशुभ कर्मावरफळें पावती गोमटीं
१११
ऐसें वदूनि विधिराजतुष्ट केला तपोभुजयापरी शक्र नमी ओजतोही वर आपीतसे
११२
मग वज्रास्त्र कां पूर्णत्यातें दिधलें कृपा करुनमग अस्त्रमंत्र सांगूनवज्रहस्त ओपिला
११३
यावरी नमितां देव कुबेरतोही होऊनियां उदारसिद्धि देऊनि समग्रदासी केल्या तयाच्या
११४
यावरी वरुण भावें नमितांतोंही प्रसन्न होऊनि चित्ताआपास्त्रमंत्रभोक्ताकेला असे त्वरेनें
११५
त्या मंत्राचा होतां पाठआपोआप धरेत नीर उठेसकळ सारितां लोटूनि लोटदिशें दिशे मिरविती
११६
यापरी नमितां द्विमूर्धनीतोही आल्हादे चित्तकामनींवर दिधला मंत्रअग्नीस्मरण होतां प्रगटावें
११७
यापरी नमितां देव अश्विनीतोही देत मंत्रमोहनीअसो सर्व देवीं वरदपाणीएकएकांनीं ओपिला
११८
मग आपुलालें आसन योजूनसिद्ध करिते झाले गमनयावरी मच्छिंद्र कर जोडूनविनवीतसे सकळिकां
११९
म्हणे महाराजा स्वर्गवासीमातें कामना वेधली कीं जीवासीमणकर्णिकास्नान मानवांसीआदर चित्तीं वाटतसे
१२०
तरी मातें करावया स्नानन्याल जरी कृपेंकरुनतरी येऊनियां कामना पूर्णकरीन आपुली महाराजा
१२१
ऐसी ऐकूनि वचनयुक्तीसकळ प्रसन्न झाले चित्तींमग स्वयें विमानीं वाहूनि श्रीपतीघेऊनियां चालिला
१२२
विमानयानें आपुले बहुतत्वरें पातलें वैकुंठनाथमग आपुले आसनीं मच्छिंद्रनाथनेऊनियां बसविला
१२३
आसनीं शयनी भोजनींएकत्रपणीं वर्ते चक्रपाणीसकळ देव पातले स्वस्थानीमच्छिंद्र वैकुंठीं राहिला
१२४
मग नित्य मनकर्णिकेचें स्नानमच्छिंद्रनाथ येत करुनयावरी पूर्ण समाधिकारणपाहूं ऐसें वाटतसे२५मग विष्णूसी म्हणे मच्छिंद्रनाथ येत करुनयावरी पूर्णजन्मांततयां गोचर करावें
१२६
अवश्य म्हणूनी नारायणमेरुपाठारीं केलें गमनमग दाही समाधी दृष्टी पाहूनसंतुष्ट झाला मानसीं
१२७
नवनारायणांच्या समाधी नवदहावी समाधी वासुदेवऐसा पाहूनि मनोभावपुनः येत वैकुंठी
१२८
असो एक संवत्सर वैकुंठनाथठेविता झाला प्रीतिवंतमग पाचारुनि उमाकांतनेता झाला कैलासीं
१२९
येथेंही एक संवत्सरपर्यतराहता झाला मच्छिंद्रनाथस्थितिवृत्तीं स्नेह बहुतवाढविले शिवाचे
१३०
यावरी कोण एके दिवशीइंद्र येऊनि कैलासासींभावें नसूनि महादेवासीमच्छिंद्रनाथा नेतसे
१३१
यावरी तीन मास अमरावतींराहता झाला योगपतीतेथेंही अत्यंत वाढवूनि प्रीतीनिरोपातें मागतसे
१३२
तों विधीनें नारद पाठवूननेलें सत्यलोकाकारणतेथेंही षण्मास राहूनविधिराज तोषविला
१३३
यापरी सकळ देव येऊनि तेथघेऊनि जाती मच्छिंद्रनाथएक एक दिन करुनि तीर्थसकळ देवांसी तोषविलें
१३४
सुरगण गंधर्व किन्नर यक्षपितृगणादि अर्यमा दक्षसकळ करुनि प्रीतीनें प्रत्यक्षतोचि एक मिरवला
१३५
असो सप्तवर्षेपर्यतस्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथसकळांचा गौरव घेऊनि अतिथपुसुनिया निघतसे
१३६
मग सकळ निघूनि स्वर्गवासीबोळविती मच्छिंद्रासीविमानीं वाहूनि मृत्युलोकासीआणूनियां घातलें
१३७
असो देव गेले स्वस्थानासीयेरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसीपुनः चालिला तीर्थाटणासीकरावया अत्यादरें
१३८
भ्रमण करितां शुद्धमहीसीजाता झाला केकाडदेशींतें परम स्थान पश्विमदेशींवज्रवन पाहिलें
१३९
तंव त्या ठायीं वज्रभगवतीमहादैवत प्रतापशक्तीभावें नमूनि अंबिकामूर्तितीर्थस्नान करीतसे
१४०
तेथें तीनशें साठ कुंडें असतीपरी उष्णोदकें भरलीं असतीतें पाहूनि परम चित्तींआश्वर्यातें मानीतसे
१४१
आश्वर्य मनांत योजूनि करीतकीं उष्णोदकें कुंडें भरिततरी तयांची राहणी पुसुनि कोणासआपण कुंडें निर्मावीं
१४२
निर्मूनि ये परी सर्वाहूनपरमागळें उष्णोदक जीवनमग सकळ तीर्थात करुनि स्नानभगवतीठाया पातला
१४३
पाचारुनि तीर्थाच्या पुजार्याजसीवृत्तांत पुसीला उष्णोदकासीविचारितां सांगे त्यासीउष्णोदककारण तें
१४४
म्हणे पूर्वी वसिष्ठें यज्ञ केलातेव्हां सकळ देव पातले स्नानालात्यांनीं निर्मूनि उष्णोदकालाकुंडं केली आपुलालीं
१४५
उष्णोदकीं स्नानाकरितां तात्कालिकनिर्मिते झाले सकळिकआपुली नामें अलोलिककुंडांलागीं ठेविलीं
१४६
द्वादश वरुषें द्वादश दिवससमस्त राहिले त्या ठायासयज्ञ पावलिया पूर्णतेससकळ गेले स्वस्थाना
१४७
तीं कुंडें अद्यापपर्यंतस्थानोस्थानीं आहेतऐसें ऐकूनि मच्छिंद्रनाथम्हणे योजिलें करावें
१४८
मग सरस्वतीसरितापात्रींजी उंचवट जागा तया क्षेत्रींपाहुनि वाटिका पवित्र नेत्रींवरुणमंत्र जल्पतसे
१४९
आपास्त्रमंत्र उच्चार पूर्णहोतांचि प्रविष्ट झालें जीवनभोगावतीचें उदक काढूनअग्निमंत्र जल्पतसे
१५०
अग्निमंत्र उच्चार होतांप्रवाहीं लागला हुताशन तत्त्वतांतेणेंकरुनि हुताशनतप्ततापावती झाली ते समयीं
१५१
शिववरदकरीं त्रिशूळ हातींतो बुडाकडोनि टाकिला महामाथींतेणेंकरुनि जीवन तप्त कुंडाप्रतीमहीलागीं विराजलें
१५२
भोगावतीचें उत्तम उदकप्रगट होतां अलोलिकआपण स्नान करोनि शुचिककरी भगवती मातेतें
१५३
भोगावतीचें उत्तम जीवनअंबिकेप्रति होतां स्नानमग ती मच्छिंद्रा प्रत्यक्ष होऊनबोलती झाली सम्यक
१५४
म्हणे जिवलगा मच्छिंद्रनाथाधन्य तूं प्रतापवंताभोगावतीजीवनातें मातेंस्नान घातलें योगींद्रा
१५५
तरी येथें एक मासवस्तीस वसावें सावकाशमग बोळवीन स्वस्थचित्तासतुजलागीं पुढारां
१५६
अवश्य म्हणोनि मच्छिंद्रनाथराहता झाला मास तेथमग रुचल्या अर्थी बोले देवीतेंबोलूनि काळ क्रमीतसे
१५७
यावरी कोणे एके दिवशींमच्छिंद्र म्हणे अंबिकेसीवज्रबाई नाम तुजसीकाय म्हणूनि सांगा हें
१५८
माता म्हणे तपोधनावसिष्ठ करिता जाहला हवनातैं शक्र पातला स्थानायालागीं महाराजा
१५९
तंव समास्थानीं सकळ ऋषीबैसले होते महातापसीतों इंद्र पातला देवकटकेंसींसमास्थानीं बैसावया
१६०
सभेंत येतां शचीनाथेंउत्थापन दिधलें नाहीं त्यातेंम्हणूनि क्षोभें अमरनाथवज्र लागीं प्रेरितसे
१६१
तें पाहूनियां दाशरथी रामशक्तिमंत्रें दर्भ मंत्रूनसोडिता झाला वज्राकारणबहु तांतडी लगबगें
१६२
मग त्या दर्भी मंत्रप्रयुक्तीमी प्रगट झालें महाभगवतीवज्र गिळूनि उदरआहुतीकरीती झालें ते समयीं
१६३
यावरी शक्रें राम तो बोलूनपूर्ण केला समाधानमग श्रीरामाचें स्तबन करुनवज्र पुन्हां मागितलें
१६४
मग तो प्रसन्न होऊनि चित्तींवज्र दीधलें मागुतीमग सकळ ऋषिदेवी मजप्रतीनांव ऐसें स्थापिलें
१६५
यज्ञ जाहला समाप्तीसकळ गेले स्नानाप्रतीपरी श्रीरामें येऊनि ते क्षितींमातें स्थापिलें अद्यापि
१६६
ती भोगवती येथें श्रेष्ठामाझी केली प्राणप्रतिष्ठातें भोगावतीचें उदक श्रेष्ठामिळालें होते मजलागीं
१६७
किंवा आतां तुझें हातींस्नाना पावली भोगावतीपरी रामाहूनि कृपामूर्तीतुवां अधिक केले बा
१६८
रामें न्हाणिलें शीतोदकेंतुवां न्हाणिलें उष्णोदकेंआणि अखंडित पुण्यश्लोकेंभोगावती दिधली त्वां
१६९
असो ऐशी संवादयुक्तीझाल्याअंती त्या उभयतींउपरी मासाची झाली भरतीनाथ पुसूनी निघाला
१७०
उत्तरदेशीं करितां गमनअयोध्यें जातां तपोधनद्वारावती तीर्थ करुनअयोध्येसी पातला
१७१
ती कथा बहु सुरसहोईल ती स्वीकारा पुढिलें अध्यायासधुंडीसुत नरहरिवंशमालू सांगे गुरुकृपें
१७२
स्वस्ति श्रीभक्तिकथासारगोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरसप्तमाध्याय गोड हा
१७३

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीदत्तात्रेयार्पपणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार सप्तमाध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.