॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय ३३

माणिक शेतकऱ्याची भेट; त्याची परीक्षा, चौरंगीनाथास बरोबर घेऊन मच्छिंद्रनाथाकरितां वीरभद्राबरोबर युद्ध. २३० ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः

जयजयाजी जगदुद्धाराकनकवर्णा नरहरि चतुराऐक्यत्वकारणें हरिहरांशक्य एक तुझेंचि
तरी आतां कृपा करुनीग्रंथ सुचवीं सुढाळ रत्नींशुभ योगी श्राव्य भाषणींस्वीकार करीं महाराजा
मागिले अध्यायीं मच्छिंद्रनंदनत्रिविकमदेहीं संचरुनगोरक्ष तीर्थस्नानाकारणेंधाडिलसे मच्छिंद्रें
यापरी गोरक्षनाथमहीं भ्रमतां नानी तीर्थतो गोदातटीं अकस्मातयेऊनियां पोहोंचला
तों गोदातटीं भामानगरतया अरण्यांत गौरकुमरपरम झाला क्षुधातुरजठरानलें करुनियां
ग्राम पाहतां तो अरण्यांतउदक एक योजन न मिळे तेथतया स्थानी क्षुधाक्रांतअनल जैसा पेटला
मार्गी चालतां दिशा लक्षीततों शेत देखिलें अकस्मातकृषिकर्म प्रांजळवंतपाहूनि सुमार धरियेला
तंव तो कृषीवल माणीकनामीवय दश वर्षे देहधर्मीमध्यान्हसमय साधूनीभोजनातें बैसला
पात्र घेतलें पुढें वाढूनकवळ करावा जों मुखीं अर्पणतों अकस्मात गौरीनंदनआदेश शब्द गाजवी
तंव तो माणीक कृषि शेतींऐकूनि आदेश शब्दाप्रतीयोजिला कवळ ठेवूनि हातींप्रेमें नमीत तयातें
१०
म्हणे महाराजा तुम्ही कोणकिमर्थ घेतलें आडरानयेरु म्हणे मी तपोधनक्षुधानळीं पेटलों
११
परम झालों तृषाकांतम्हणोनि होऊनि आलों अतिथतरी सन्निध अन्न असेल तूतेंभिक्षा आम्हां ओपावी
१२
ऐशी ऐकतां तयाची वाणीम्हणे महाराजा योगेंद्रमुनीनिधान आहे मनोधर्मीपात्र वाढिलें भक्षावें
१३
मग तो उठोनि त्याचि वेळींशीघ्र ओपी पत्रावळीआणि मृत्कुंभ भरोनि जवळीशीघ्र करी पुढारां
१४
मग तो गोरक्ष तपोधनहस्तपाद प्रक्षाळूनअन्नपात्र पुढें घेऊनजठराहुती घेतसे
१५
पूर्ण झाल्या जठराहुतीमग सहजचि तुष्ट झाला चित्तींकीं रुखा होतां जलप्राप्तीलवणाकार पावतसे
१६
कीं दरिद्याप्रती देतां धनमग कां न पावे तुष्ट मनकीं यथेच्छ मेळविता झाल्याकारणतोष शरीरीं मिरवेना
१७
तन्नाय कृषिनरेंद्रात्तमाघडूनि आलें तुष्टमहिमामग प्रसन्न होऊनि चित्तद्रुमावरदफळा दावी तो
१८
म्हणे कृषिका कवण काममिरवला हो देहधर्मीयेरु ऐकोनि म्हणे स्वामीआतां कासया पुसतां हो
१९
तरी महाराजा आटाआटीकरावी प्रथम कार्यासाठीकार्य झालिया व्यर्थ चावटीअन्यासी कासया शिणवावें
२०
तरी आतां कार्य झालेंपुढें योजीं शीघ्र पाउलेंगोरक्ष म्हणे बोलशी बोलसत्य असती तुझे बा
२१
परी तुवां मातें दिधलें अन्नतेणें मम चित्त झालें प्रसन्नतरी तव देहीं किंचित पणसत्य असेल वद मातें
२२
जे जे कामना असेल तूतेंती पूर्ण पावशी फळसहितेंयेरी ऐकूनि कृषी त्यातेंऐसें उत्तर देतसे
२३
म्हणे महाराजा महीपाठींतुम्हीच हिंडतां भिकेसाठीते तुम्ही मोह धरुनि पोटींमातें काय द्याल जी
२४
भणंगापाशीं भणंग गेलातो काय देऊनि तृप्त झालाखडका उदकपान्हा बोलाकदाकाळी दिसेना
२५
तुम्ही तेवी हिंडतां अन्नासाठीआम्हां काय देणार जेठीनाथ म्हणे इच्छातुष्टाआतां तुझी करीन बा
२६
येरी म्हणे पुरें बोलणेंकाय आहे तुम्हांस्वाधीनतरी आणिक तुजकारणलागत असेल तें माग
२७
नाथ म्हणे रे एक दानतुवां दिधल्या झालों प्रसन्नतरी कांहीतरी मजपासूनमागूनि घेई कृषिराया
२८
येरु म्हणे उगला ऐसतुवां काय द्यावें आम्हांसतरी कांहीं न मागूं सुरसपंथ आपुला क्रमीं कां
२९
ऐसे बोलतां माणीकनामीगोरक्ष विचारी आपुलें मनींआडबंग असती कृषिधर्मीसदा विपिनीं बैसूनियां
३०
तरी हा मातें म्हणतो मागपरी त्याच्याचि हितार्थ करावा लागऐसें विचारोनि मनोवेगेंतयालागीं बोलतसे
३१
म्हणे कृषिराया ऐक वचनतूं आम्हांसी म्हणशील देऊं देणेंतरी मागें सरस वचननिश्चयें करुनियां बोलावें
३२
येरु म्हणे तापसा ऐकमातें दिससी महामूर्खजो देणार आपुले आत्मसुखतो मागें सरणार नाहीं कीं
३३
अरे चंद्र असे शीतळपणींतरी तो वर्षेल दाहकपणींपरी तो ढळणार नाहीं प्राणीमागें पाऊल कासया
३४
सविताराज तेजोदीप्तीतोही अंधकारीं करील वस्तीपरी उदार तो औदार्याप्रतीमागें पाऊल सारीना
३५
मही गेलिया रसातळींपरी औदार्यप्राप्ती महाबळीत्या कृपणत्व कदाकाळीअंगालागीं स्पर्शेना
३६
तरी कोणतें मागणें तूतेंमागूनि घेईजे त्वरितेंमी बोललों निश्चयातेंनिश्चय माझा पाहीं कां
३७
ऐशी बोलतां विपुल वार्तागोरक्ष म्हणे आपुल्या चित्तातरी मनाचे करणें मागूं आतांकैसा सांभाळील पाहू तो
३८
ऐसा विचार करुनि चित्तींम्हणे मज दावीं कां विपिनपतीजें जें आवडेल तुजे चित्तींतें तूं न करीं महाराजा
३९
कांही एक इच्छील तुझें मनतें तूं न करणें हेंचि मागणेंइतुकें देऊनि तुष्टपणबोळवीं कां कृषिराजा
४०
ऐशीं वदतां तयाची वाणीअवश्य म्हणे कांषकर्मीहा धर्म आतां आपुले धर्मीअर्कअवधीं रक्षीन गा
४१
ऐशी तैशी देऊनि भाकतुष्ट केलें शरीरासअसो गोरक्ष त्या विपिनाससांडूनियां चालिला
४२
माणिकनामी कृषी शेतांतमुक्त करिता झाला औतयेठणें बांधूनि समस्तभार सकळ वाहातसे
४३
वृषभा मागें दिधलें लावूनमौळीं घेत येठण उचलूनमनांत म्हणे ग्रामासी जाऊनक्षुधाबल घालवावें
४४
इतुकी मनीं योजना होतांस्मरण झालें गोरक्षनाथापुत्र कल्याण आणितां चित्तामनाचें करणें उल्लंधावें
४५
मन इच्छीत असे घरीं जावयातरी आपण न जावें तया ठायामग तेथेंचि उभा राहूनियांगाढ निद्रा करीतसे
४६
मौळीं येठणाचा भारघेऊनि उभा महीवरनेत्र झांकूनि चिंतापरहरिनामीं योजितसे
४७
मन इच्छी हालवूं अंग परी न हाले धडभागस्थिर होऊनि संचरले ओघवचनार्थ संपादी
४८
तरुपर्ण जे येती उडोनतेचि करीतसे भक्षणमनीं येतां सांठवणतेही त्याग पर्णीचे करीतसे
४९
मग सहजस्थितीं वायुलहरअकस्मात येतसे मुखावरतितकेचि प्राशन आहारपरअमल मन होतसे
५०
तेणें कृश झालें शरीरसकळ आटूनि गेलें रुधिरमांस म्हणाया तिळभरस्वप्नामाजी दिसेना
५१
त्वचा अस्थि झाल्या एकउभा राहिला कष्टदायकयेरीकडे तपोबाळकबद्रिकाश्रमीं पातला
५२
बद्रिकेदारा नमूनि त्वरितपाहूं चालिला चौरंगानाथतंव गुहागृहीं शरीरावरतींवाळवीवारुळ विराजले
५३
मुखीं तितुकी नामावळीआणि नेत्रचंद्रीं असे शिळाभारींअसे स्थिर तया स्थळींगोरक्षनाथ प्रगटला
५४
त्वरित द्वाराची शिळा काढूनपाहे तयाचे शरीराकारणेंतों वारुळ गेलें वेष्टूनसर्व अंगीं तयाच्या
५५
शिळाचंद्री न हाले पातीरामशब्दें वलगे उक्तीतें पाहूनियां गोरक्ष जतीपरम चित्तीं हळहळला
५६
मग शरीराचे वारुळ काढूनपाहे तयाचे शरीराकारणतों हस्तपाद लवेंकरुनतपोबळें आले ते
५७
मग सावध करुनि तयातेंम्हणे पाहें मी आलों गोरक्षनाथशीघ्र कवळूनि तयाचा हस्तबाह्यात्कारीं आणिले
५८
मग कृपें करितां अवलोकनशरीरशक्ति आली दारुणमग उठूनि वंदी गोरक्षचरणम्हणे सनाथ झालों असें मी
५९
यापरी तयासी आलिंगुनी नाथम्हणे बा कैसा झाला चरितार्थयेरी म्हणे मज माहीतनाही चामुंडे विचारी
६०
मग विचारुनि चामुंडेसीवृत्तांत पुसे चरितार्थासीयेरु म्हणे आम्ही फळांसीदेत होतों महाराजा
६१
परी चौरंगी न करुनि भक्षणबैसला होता शिळा लक्षूनमग फळेंचि पर्वताप्रमाणेंगोरक्षातें दाविलीं
६२
फळनगा पाहोनि तपोजठीविस्मय करी आपुल्या पोटींम्हणें धन्य याची तपोराहाटीब्रह्मादिकां अतर्क्य
६३
परम चित्तीं कृपा वेष्टुनीमौळीं ठेविला वरदपाणीअनुग्रहचोज पुन्हां दाउनीब्रह्मसनातन केला असे
६४
पुढें चौरंगीसी घेऊनबद्रिकेदारालया आणूनजागृत करुनि उमारमण चौरंगीतें भेटविला
६५
मग तेथें राहूनि षण्माससकळ करविला विद्याभ्यासअस्त्र शस्त्र बहुवसप्रवीण झाला महाराजा
६६
मग सकळ देवांतें पाचारुनतपोवळें केलें सधनमग सकळ दैवतें तुष्ट करुनवरदप्रज्ञा आराधिलें
६७
सकळ देव वर देऊनपहाते झाले आपुले स्थानयेरीकडें बद्रिकेदार नमूनचौरंगीसह निघाला
६८
त्वरें येऊनि वैदर्भ देशांतचौरगींतें कौंडिण्यपुर दावीतम्हणे बा रे तव माता तातभेट घेई तयांची
६९
भेटशी तरी कैसा त्यातेंजगीं जाऊनि अति ख्यातहस्तपदांचे मुंडणखंडणनिमित्तउत्तरा सड घेईजे
७०
राये छेदिलें तव हस्तपदासीपरी धुसधुसी आहे मम मानसींतरी आपुला प्रतापसंगम रायासीनिजदृष्टीं दावीं कां
७१
अवश्य म्हणे चौरंगीनाथभस्मचिमुटी कवळुनि हस्तरायाचें लक्षूनि बागाईतवातास्त्रासी सोडीतसे
७२
तंव तेथींचे वनकरसहा शत एक सहस्त्रवातचक्रें उडवूनि अंबरदाविता झाला तयांसी
७३
पुन्हां वातअस्त्र घेत काढूनतंव ते उतरती महीकारणकिती पडले मूर्च्छना वेष्टूनकितीएक ग्रामीं पळाले
७४
तें येऊनि राजांगणीसांगते झाले विपरीत करणीकोणी केली न दिसे नयनींआश्चर्य बहु होतसे
७५
मग भृत्यांतें पाचारुनपुसूनि त्यातें वर्तमानकोणी केलें आला कोणशोधालागी धाडीतसे
७६
तों येरीकडे चौरंगीसहितपाणवठी बैसला गोरक्षनाथहेर पाहूनि त्वरितरायापाशीं पातले
७७
म्हणती महाराजा पाणवध्यासीबैसले आहेत दोन तापसीतीव्रतेजी कानफाटवेषीविद्यार्णव दिसताती
७८
ऐसें ऐकूनि राजेश्वरस्वननीं आपुला करी विचारआले असती गोरक्ष मच्छिंद्रपुत्रदुःखें द्वेषानें
७९
तरी आतां त्वरेकरुनतयांसी जावें शरणनातरी ग्रामासी पालथें करुनप्राणांप्रती हरतील
८०
ऐसा विचार करुनि मानसींराव सामोरा ये समारंभेंसीगज वाजी शिबिका रथांसीकटकासह येतसे
८१
ग्रामाबाहेर कटक येतांगोरक्ष म्हणे चौरंगीनाथाआपुला प्रताप आतांनिजदृष्टीं दावीं कां
८२
ऐशीं ऐकतां गोरक्षगोष्टीपुन्हां कवळी भस्मचिमुटीवातास्त्र जल्पूनि पोटीचमूवरी प्रेरीतसे
८३
मग तंय वातास्त्र अति तीक्ष्णचमूसह राया दाविलें गगनरथ गज वाजा शिबिकासनवातास्त्रें पाडिली
८४
तेणेंकरुनि चभू समस्तगगनपंथें आरंबळतम्हणती हे महाराजा नाथशरणागता तारावें
८५
सकळ स्तविती दीनवाणींते शब्द ऐकोनि तपोज्ञानीचौरंगीसी म्हणे घे उतरोनीचमूसहित रायातें
८६
मग तो कुशल प्रज्ञावंतपर्वतास्त्र असे आड करीतमग सकळ आटूनि गेला वातचमू मिरवली नगमौळी
८७
मग उभा करोनि आपुला करम्हणे उतरुनि यावें चमू समग्रमग रायासह कटकभारउतरले तळवटी
८८
मग समीप येतां शशांगरचौरंगीसी बोलिला गौरकुमरपितयासी करुनि नमस्कारतुष्ट चित्तीं मिरवीं कां
८९
ऐसें ऐकतां गुरुनंदनधावूनि धरिले तातचरणम्हणे महाराजा मी तव नंदननिजदृष्टीं देखें मज
९०
ऐसे बोलतां चौरंगनाथरावें धांवूनि धरिले हदयांतमग परम प्रीतीं गोरक्षातेंचरणीं भाळ अर्पीतसे
९१
मग गोरक्षही धरुनि हदयींम्हणे राया याचा प्रताप पाहींयेरी म्हणे तुजसमान आईभेटल्या न्यून कायसें
९२
याउपरी तैसें चौरंगीनाथवज्रास्त्र निर्माण करीतचूर्ण करुनि महापर्वतअदृश्यपंथीं मिरवतसे
९३
याउपरी शशांगरगोरक्षासी म्हणे चतुरआरोहण करुनि शिबिकेवरराजसदनीं चला जी
९४
याउपरी बोले चौरंगीनाथआम्ही न येऊं तव गृहांतसापत्न मातुःश्रीचे कुडें मनांतहस्तपाद छेदिले
९५
मग मूळापासोनि सकळ वृत्तांतरायालागीं केला श्रुतराव कोपोदधींतउचंबळला आगळा
९६
सेवकालागीं आज्ञा करीतताडीत आणा राणी येथतें ऐकूनि चौरंगीनाथकाय परी वदतसे
९७
म्हणे ताता आपुलें वचनहेचि शिक्षा आली घडूनयापरी ताता आपुले कीर्तीनेंब्रह्मांड भरेल महाराजा
९८
तरी ऐसें न करीं तातासदनींच शिक्षा करावी प्रीतामग शिबिकासनी बैसवूनि तत्त्वतांराजसदना पातले
९९
राव जातां मंदिरांतपादत्राण घेऊनि हातांतताडन करुनि पत्नीतेंम्हणे जाई येथूनी
१००
द्वादश संवत्सरपर्यंतत्वां तप केलें शुचिष्मंततयाचें फळ कुडें मतभ्रष्ट केलें राज्यासी
१०१
तें पाहूनि गोरक्षनाथेंराया संबोधूनि केला शांतएक मास राहिला तेथशशांगरभक्तीनें
१०२
यापरी गोरक्ष जातेसमयींवंश वेष्टी मोहप्रवाहींप्रसाद देऊनि राजदेहीवीर्यवान पैं केला
१०३
म्हणे कामिनी करुनि दुसरीभोगीं वंशलतेची लहरीऐसें सांगूनि शशांगरींचौरंगीसह चालिला
१०४
मार्गी चालतां मुक्कामपाहते झाले प्रयागस्थानस्नान करुनि उत्तोमात्तमशिवालयीं पातलें
१०५
येतांचि करुनि शिवदर्शनमग शिवदारे बोलूनि वचनगुरुकलेवराचें वर्तमानतियेलागी पुसतसे
१०६
तंव ती होऊनि भयभीतबोलती झाली चाचरे घेतशरीरेंकरुनि थरथरां कोपितपायावरी लोटली
१०७
म्हणे महाराजा गुरुनाथाराजाभाजा रेवतीकांतातिनें मातें भ्रष्टवूनि चित्तापुसूनि घेतलें होतें कीं
१०८
याउपरी दुसर्याालागुनीवदलें नाहीं कलेवर कहाणीपरी नेणों भय वाटे मनींकलेवर पहा निजदृष्टी
१०९
स्त्रीजाती बोलती एकपरी करणी करिती आणिकमज वाटतसे ती चाळकसमक्ष दृष्टीं पहावें
११०
ऐसी ऐकूनि तियेची वाणीपरम घाबरला गोरक्षमुनीमग एकांत गुहासदनींविदारुनि पाहतसे
१११
तंव तें मोकळे गुहागारआंत नाहीं कलेवरमग नेत्रीं दाटूनि मोहाचा पूरशोकसिंधु उचंबळे
११२
तंव तो म्हणे महाराजा प्रज्ञावंतासोडूनि दिधली माजी ममताआतां येथें गुरुनाथाकवणे ठायीं पाहूं मी
११३
ऐसें म्हणूनि आरंबळतधरणीप्रती शरीर टाकीततंव ती शैवदारा मोहस्थितहोऊनि त्यातें बोलतसे
११४
म्हणे महाराजा धैर्य धरींमीं राजांगने जाऊनि सत्वरींपुसूनि येतें मच्छिंद्रशरीरींवृत्तांत कैसा झाला तो
११५
ऐसें बोलूनि गोरक्षातेंशैवदारा अंतःपुरांतशीघ्र जाऊनि रेवतीतेंराजनेमानें नमियलें
११६
तंव ती पाहूनि शैवकामिनीम्हणे कां आलीस वो माय बहिणीयेरी म्हणे अंतःकरणींआठव मातें झालासे
११७
म्हणाला तरी आठव कोणतरी द्वादश वर्षे आलीं भरुनतुम्हांलागीं सांगितली खूणराजभागीं विचारा
११८
ऐसी ऐकतां तियेची वाणीएकांता ने ते राजपत्नींम्हणे माय वो अंतःकरणींचिंता सोडीं सकळ ती
११९
अगे तुजविरहित त्याचि दिवशींकलेवर काढूनि शस्त्रउद्देशीवांटले गे रतिरती मांसींसकळ विपिनामाझारी
१२०
त्यासही लोटले बहुत दिवसअस्थिमांसाचा झाला नाशजीवजंतू खाऊनि त्यासविष्ठा मृत्तिका झाली असे
१२१
तरी या कार्याचा सकळ तरुसमूळीं उपटिला बीजांकुरुआतां चिंतेचें फळ अपारुकोठूनि दृष्टी पडेल
१२२
ऐसें बोलता राजांगनापरम चितें व्यापिली मनाम्हणें नेणों पुढिल्या कर्माकैसें घडोनि येईल
१२३
परी आतां असो कैसें श्रुत करावें गोरक्षासजें जें असेल प्रारब्धासभोग भोगणें लागेल
१२४
ऐसा विचार करुनि चित्तींपुनश्व आली शिवालयाप्रतीजे वदली रेवती युक्तीप्रांजळ तैसें सांगितले
१२५
सांगतां ऐकिलें नाथेंपरम पेटला क्रोधानळातेंम्हणे शिक्षा करावी राजभाजेतेंदुःखार्णवीं बुडवूनियां नाथें लागतसे
१२७
जरी अवज्ञा करुनजंतूंचे झालें भक्षणतरी आतां शोधार्थ मनमच्छिंद्रशरीरीं ठेवावें
१२८
न द्यावें तिसी शिक्षेकारणेंतें नाश न पावे निश्चय पूर्णकोणे तरी ठाया लागूनमच्छिंद्रदेह असेल
१२९
मग बोलावूनि चौरंगीतेंम्हणे बा रक्षीं शरीरातेंमी देहासी सांडूनि त्रिभुवनातेंकलेवर शोधार्थ जातों कीं
१३०
परी रेवती येथील राजकांताप्रवर्तली आहे मच्छिंद्रघातातैशीच वहिवटेल माझिया अर्थाम्हणूनि सावध असावें
१३१
ऐसें सांगूनि चौरंगीतेंप्रवेश करी गुहागृहातेंप्राण सान शरीरातेंभ्रमण करी दक्ष दिशा
१३२
सकल शोधला जंबुद्वीपसरितार्णवीं सकल आपग्राम कानन सप्तद्वीपरतीरती शोधिलें
१३३
परी जीवजंतूची देहस्थिती होऊनशोधितां गुरुचें कलेवर पूर्णकोणेतरी ठायालागूनमच्छिंद्रदेह असेल
१३४
अतळ वितळ सुतळ पाताळसप्तही पाताळस्थळपिंडब्रह्मांड शोधूनि सकळस्वर्गावरी चालिले
१३५
सुवर्लोक भुवर्लोक तपोलोकअर्यमा यक्षादि सत्यलोककुबेर तारागणादि अनेकशोधूनियां पाहिले
१३६
एक मेरु स्वर्गपाठारगणगंधर्वादि अन्य सुरवरसकल शरीरा करुनि संचारगुरुशरीरे शोधिलें
१३७
उपरी पाहूनि वैकुंठ समस्तत्वरें पातला कैलासाप्रततों होतांचि प्रवेश शिवगणांतधुंडाळूनि पाहतसे
१३८
तों शिवगणीं चामुंडासमुदायांतअस्थि त्वचा मांस देखे समस्तयापरी वीरभद्र सर्व गणांतगर्जोनियां सांगतसे
१३९
म्हणे द्वादश वर्षाचा सरला नेममच्छिंद्रशवातें करा रक्षणतयाचा शिष्य गौरनंदनकोणे रुपें येईल कीं
१४०
ऐसी ऐकूनि तयाची वार्तागोरक्ष तेथूनि झाला निघतातों येरीकडे चौरंगीनाथाकाय सुचलें होतें कीं
१४१
गोरक्षशवाजवळ बैसूनआणीक सकळ अस्त्र व्यापूनजेथें लाग न लागे देवांकारणब्रह्मादिकांकरुनियां
१४२
ऐसें अस्त्र व्याप्ततैशांतूनि निघूनि गौरसुतगुप्तवेषें शरीरांतयेऊनियां प्रवेशला
१४३
प्रवेशतांचि अकस्मातउठूनि बैसला गौरसुतमार्ग सोडूनि गुहागृहांतबाहेर आले उभयतां
१४४
मग सिद्ध करुनि भस्मझोळीउभे राहिले दोन्ही बळीपर्वतास्त्र तेणें काळींअर्कावरी सोडिलें
१४५
गोरक्षमुखींचें पर्वतास्त्रप्रविष्ट होतां अति स्वतंत्रमाथां उचलितां अंबरपात्रभरोनियां निघाले
१४६
सवालक्ष योजनमितीस्वर्गी उंच झाले गभस्तीत्याहूनि माथा द्विगुण पर्वतीअंबरातें मिरवला
१४७
मित्रमार्गीचा धरुनि रोकआकाशस्तंभ झाला एकतेणेंकरुनि स्यंदनीं अर्कमार्गावरी अडखळला
१४८
चक्रपदा चालावया वाटन मिळे पाहूनि सुभटमग सज्ज करुनि गांडीवचिमुटीयोजिता झाला महाराजा
१४९
तीव्रशरीरीं वज्रास्त्रयोजूनि सोडी प्रविष्ट मित्रतेणेंकरुनि पर्वतास्त्रभंगिता झाला ते क्षणीं
१५०
परी पर्वतास्त्र भंगित होतांआदित्य विचारी आपुले चित्ताहें अस्त्र कोणाची प्रतापदुहिताआडमार्गी झालें असे
१५१
ऐसें पाहतां अर्क अंतरीतो समजला नर गोरक्षकेसरीमग स्यंदनासह महीवरीयेऊनियां प्रगटला
१५२
येतां देखती अर्कराजकाय करिती हो विजयध्वजचंद्रास्त्राचें पेरुनि बीजकोटी चंद्र निर्मिले
१५३
तेणेंकरुनि शीतळ प्रवाहींमिरवती झाली महीमग तो सकळ दाह स्वभावींबाधूं न शके अर्काचा
१५४
ऐसी समाधानस्थिती होतांपरी समीप पावला प्रविष्ट सवितामग चौरंगी आणि गोरक्षनाथअर्कचरणी लागती
१५५
यापरी भाविकस्थिति सांगूनबोलता झाला जगलोचनबा रे तुज सुखसंबंध कोणदर्शवीं कां वाचेशीं
१५६
येरु म्हणती महाराजाआम्ही उदेलों एक काजामच्छिंद्रदेह तेजःपुंजाशिवगणें हरियेला
१५७
तरी आपण जाऊनि तेथेंसुनीति सांगावी वीरभद्रातेंकी मच्छिंद्रदेह महीतेपाठवूनि द्यावा कीं
१५८
परी या कार्या बहुधा नीतीसांगूनि जरी ना ऐकतीमग मागूनि बोलावूनि घेऊं या क्षितींयुद्धालागीं मिसळाया
१५९
ऐसें पर्वी महापर्वीआमुची जाऊनि करावी शिष्टाईइतुका उपकार मच्छिंद्रदेहींआम्हांसी साह्य मिरवावें
१६०
ऐसें बोलतां गोरक्षनाथआदित्य अवश्य त्यांतें म्हणतमग त्या क्षणीं कैलासा जातत्वरित जाऊनि पोंचला
१६१
गणें पाहूनि अर्क येतां सहजपापांलागीं विजयध्वजम्हणती येणें महाराजकवण्या अर्था झाले असें
१६२
आदित्य म्हणे ऐका वचनगोरक्षशिष्टाईसाधनकरुं पातलों तुम्हांकारणमच्छिंद्रदेहाकारणें
१६३
तरी मम बोलणें आतांचित्त द्यावें परम हितामहीसी पाठवा मच्छिंद्रदेह आतांतुष्ट करीं गोरक्षा
१६४
तुम्हीं तुष्ट केलिया त्यासनाथपंथें वाढेल प्रीतऐसें उत्तर बोलतां आदित्यवीरभद्र बोलतसे
१६५
हे महाराजा ऐक वचनआम्हांसीं दुःख दिधलें मच्छिंद्रानेंतरी आतां गेलिया प्राणमही न दाऊं शबातें
१६६
जरी गोरक्ष झुंजेल आम्हांतेंतरी सिद्ध होऊं युद्धातेंगोरक्ष जिंकूनि समरंगणातेंमच्छिंद्रासम करुनि ठेवूं
१६७
उपरी बोले नारायणमच्छिंद्रें दुःख दिलें तुम्हांकारणतेव्हां तुमचा प्रताप पळूनकवण ठाय गेलासे
१६८
आतां अवचट घडलें ऐसेंम्हणूनि प्रौढ झाला मानसेंपरी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्षप्रतापबळी असे कीं
१६९
तेव्हां मच्छिंद्र होता एकआतां दोघे असती प्रतापअर्कते कोपल्या सकळ धाककृतांतासम योजिती
१७०
येरु म्हणती असो कैसेपरी कदा न देऊं मच्छिंद्रासयापरी बोलतां राजसआवडेल तैसें करावें
१७१
परी एक आणिक वचनतुम्ही उतरा महींकारणस्वर्गी करितां कंदनशिवलोकांत पावेल तें
१७२
म्हणती कीं यासी काय कारणतरी ते प्रतापी असती तीक्ष्णकैलासगिरि पिष्ट होऊनखंड करितील क्षणाधें
१७३
परी ते पाहूनी येथील वस्तीविनाश होईल स्वर्गाप्रतीमग त्या कोपे पशुपतीशासन करील तुम्हांतें
१७४
भवभवानी अति प्रीतीकरिती गोरक्षमच्छिंद्रांप्रतीपहा शरीरज सवें चामुंडांहातींकैलासातें पाठविले
१७५
तरी आतां शिवा न कळतांमानेल तैसे करावें चित्ताऐशी गोष्ट आदित्य बोलतांसर्वां परी मानलें
१७६
मग वीरभद्र म्हणे सर्व गणांसीतुम्ही युद्धा जावें सर्व महीसीदुःख लागतां कांहीं रणासीमीही येतों मागून
१७७
मग अष्टभैरवगणअवश्य म्हणूनि करिती गमनविमानें प्रत्यक्ष घेऊनशस्त्रअस्त्रादिकीं उतरले
१७८
बहात्तर कोटी चौर्यानयशीं लक्षयेतांचि देखे नाथ गोरक्षमग चौरंगीतें बोले प्रत्यक्षसावध होई मम वत्सा
१७९
असो शिवगण येतांचि महींलोटते झाले शस्त्रप्रवाहींतें गोरक्ष पाहूनि त्या समयींवर्जास्त्र निर्मियेलें
१८०
वज्रास्त्र पातलें लव न लागतांसहस्त्र वेळां भवतें फिरतांतेणें शिवगणांचे शर समस्तअंगी लिप्त न होती
१८१
तें पाहूनियां सकळ शिवगणयोजिती अपार अस्त्रांकारणतितुक्याहीं अस्त्रां उभय जनलक्ष्य धरुनि उडविती
१८२
अग्निअस्त्र धूमास्त्रतयावरी प्रेरिती वातास्त्रवातास्त्रावरी उरगास्त्रप्रेरिते झाले शिवगण
१८३
काळास्त्र आणि वज्रास्त्रमहाकठिण स्पर्शास्त्रतयामाजी दानवास्त्रप्रळय करीत आगळा
१८४
तें पाहूनि गोरक्षनाथप्रेरिता झाला जलदास्त्रतयामागें पर्वतास्त्रलागोपाठ करीतसे
१८५
तयामागे खगेंद्रास्त्रतयामागें संजीवनी अस्त्रमग प्रेरी इंद्रास्त्रते जाऊनिया झगटे
१८६
विभक्तास्त्र देवास्त्र कठिणतींही झगटती त्वरेंकरुनऐसें अस्त्र परिपूर्णगण अस्त्र तें भंगिती
१८७
त्यात काय करी चौरंगीनाथहळूचि मोहनास्त्र प्रेरीततें संचरुनि गणहदयांतमग पिसाटपणें मिरवत
१८८
सर्वासी नाहीं देहभानतेणें न कळे आलों कोणकार्यालागूनपिशाचवृत्तीं भ्रमत रानोरानव्यर्थ फिरते जाहले
१८९
त्यांत आणिक चौरंगीनाथप्रेरी प्रळयकाळींचा वाततेणें गण समस्तवायुचक्रीं पडियेले
१९०
तों वीरभद्र मागूनि चामुंडेसहितयुद्धालागीं आला त्वरितपरी शिवगण पाहूनि अव्यवस्थितपरम चित्ती क्षोभला
१९१
मग गांडीवातें टणत्कारोनीबाण योजिले अपार गुणीकामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तीन्हीविविध बाणीं पाडीतसे
१९२
जैसा प्रळयकाळींचा वडवानळतो यत्नें न पावे कदा शीतळतन्न्यायें शिवबाळकोपानळी वेष्टिला
१९३
तें पाहूनि चौरंगीनाथरतिअस्त्र प्रेरीत त्वरीततेणें कामास्त्र त्वरें निश्चितमूर्च्छित होऊनि पडियेले
१९४
यावरी दुसरें चौरंगीनाथदशासुरी अस्त्र प्रेरीततें पाहुनियां नाभीसुतझडझडोनि पळतसे
१९५
चित्तीं म्हणे नोहे बरवेंवेद हरतील आतां सर्वशंखासुर प्रतापार्णवपुनः उदय झाला असे
१९६
ऐसा विचार करुनि मनींब्रह्मास्त्र दडविलें अदृश्यपणींपुढें कामिनीअस्त्र चौरंगीमुनीग्रेरिता झाला लवलाहे
१९७
तें पाहूनि कार्तिकास्त्रपळूनि लपवी मुखपात्रपरी चौरंगीचे पांचजन्यास्त्रप्रळयालागीं मिरवले
१९८
तें पाहूनियां भद्रजातीमत्स्यास्त्र योजिलें परन निगुतीतेणे करुनि तदस्त्र शांतीअदृश्य तें मिरवलें
१९९
परी परम कोपोनि तपोबळतीव्रास्त्र योजिलें तत्काळसंजीवनी योजूनि सबळसकळ दानवां उठलें
२००
ते दानव म्हणाल कोण कोणत्रिपुरसुंदराक्ष मलमृदु मान्यम्हैसासुर जालंधर प्राज्ञकाळयवन अघ बक
२०१
हिरण्याक्ष हिरण्यकश्यपसहितमुचकुंद बळी वक्रदंतरावण इंद्रजित कुंभकर्ण त्यांतसिंहनाद भरिताती
२०२
ऐसे सबळ राक्षस उठतांविमानयानीं सुरवर असतांअति भय मानूनि चित्ताविमानांतें पळविती
२०३
कैंचे युद्ध कैचें पाहणेंपळती सुर भयभीत होऊनतेहतीस कोटी देवतांकारणचिंता अपार व्यापिली
२०४
म्हणे रावणें बंदीं घातलेंदैवें दाशरथी रामें सोडिलेंआतां दैन्य भोगूनि आलेंदुःख अपार येधवां
२०५
ऐसे होऊनि भयभीतकंपे व्यापिले ते समस्तअसो सुरवर जाऊनि वैकुंठातनिवेदिती श्रीरंगा
२०६
मग तो दयाळ चक्रपाणीऐसी ऐकूनि सुरवरवाणीम्हणे भोग आला परतुनीअवतारदीक्षेकारणें
२०७
मग तो परम दचकूनि चित्तींशिव पाचारिला सुरवरांहातीबैसवूनि स्वसंगतींविचित्र करनी निरोपिली
२०८
म्हणे गोरक्षें केलें अनुचितपुनः उठविले दानव समस्तआतां दानव तरी रसातळाप्रतमही सकळ नेतील कीं
२०९
एक एक दानवासाठींआपण माराया झालों कष्टीकल्पावरी अवतार जेठीधरुनियां भीडलो
२१०
तरी आतां कैसें करावेंनिवटतील कैलासा सकळ दानवअहा मूर्ख तो वीरभद्ररावव्यर्थ द्वेषीं मिरवला
२११
मग सोडूनि वैकुंठासीयेते झाले गोरक्षापासीम्हणती बा विपरीत महीसीपुत्रा हें काय मांडिले
२१२
अरे एकएका राक्षसालागींआम्ही श्रमलों बहु प्रसंगींअवतार घेऊनि नाना रंगींहनन केलें तयांचे
२१३
तरी आतां कृपा करुनअदृश्य करीं दानवांकारणयेरी म्हणे गुरुशवा आणूनद्यावें आधीं मजलागीं
२१४
मग शिवें बोलावूनि चामुंडेसीमच्छिंद्रशवातें आणविलें महीसीम्हने बा घेई आणि राक्षसांसीशांतदृष्टी दावीं कां
२१५
यापरी गोरक्ष म्हणे त्यांतेंदानव नोहेत अस्त्रव्यक्तसंजीवनी प्रयोग देहस्थितदानव उदया पावले
२१६
तरी अवतार घेऊनपुनः योजा रणकंदन नातरी वीरभद्राची आस्था सोडूनद्यावी लागेल तुम्हांते
२१७
यावरी बोले भालदृष्टीयेर पोर नाहीं म्हणे पोटींपरी नाथा राक्षस जेठीदुःख देतील आम्हांतें
२१८
एक मधुदैत्य माजलातेणे पळविले रानोरानीं आम्हांलाशेवटीं एकदशीनें त्यालामृत्युमुखी पाठविलें
२१९
ऐसें दुःख सांगावें कितीतरी आतां कृपामूर्तीवेगी निवटी राक्षसांप्रतीपुत्रमोह साडिला
२२०
ऐसें शिव विष्णु बोलतयेरीकडे राक्षस समस्तवीरभद्र पाहूनि झुंजतधनुष्यबाण कवळूनियां
२२१
परी तो प्रतापी भद्रजातीएकटा झुंजतो सर्वाप्रतीनानाशस्त्रअस्त्राकृतीनिवारींत बलिष्ठ
२२२
तुष्ट होतां गोरक्ष जतीवाताकर्षण अल्पयुक्तींभस्मचिमुटी रणकंदनाप्रतीफेंकूनियां देतसे
२२३
ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्णएकमेळीं माजले कंदनयेरीकडे शिवविष्णूंनीस्तुतीं तुष्टविला गोरक्ष
२२४
तेणें दानव वीरभद्रासहितमहीं पाडिले निचेष्टितश्वासोच्छवास कोंडूनि समस्तप्राणरहित झाले ते
२२५
सबळ अस्त्रेम वाताकर्षणठाऊक नव्हतीं देवदानवांकारणपरी नाथपंथीं तीं येऊनप्रसन्न झाला कृपेनें
२२६
असो वीरभद्र आणि दानव समस्तरणीं निमाले प्रतापवंतत्यावरी गोरक्षें जल्पूनि अग्निअस्त्रसकल केले भस्म तेणें
२२७
यावरी पुढें पंचाननवेष्टिले अति मोहानेंतें पुढीले अध्यायीं सकळ कथनश्रोतियानी ऐकावें
२२८
परम साधन योजूनि चित्तींपाठ थापटूनि वक्त्याप्रतीभला भला म्हणवूनि उक्तीश्रोते करिती तत्कृपें
२२९
परम अवधाना योजूनि चित्तवक्ता जाहला धुंडीसुतनरहरि मालु नाम ज्यांतसंतसेवे अनुसरला
२३०
स्वास्त श्रीग्रंथ भक्तिकथासारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरत्रयस्त्रिंशति अध्याय गोड हा
२३१

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ नवनाथभक्तिसार त्रयस्त्रिंशतिअध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.