॥ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥
श्री नवनाथ भक्तिसारश्रद्धा · साधना · आत्मानंद

श्री नवनाथ भक्तिसार · मूळ पोथी

अध्याय ३२

त्रिविक्रमराजाची कथा, राजाच्या मृत्युनंतर त्याच्या देहांत मच्छिंद्रनाथाचा संचार. १९२ ओव्या · कथासार वाचा

श्रीगणेशाय नमः जयजय जगदुद्धाराजगदाश्रिता रुक्मिणीवरादीनबंधो दयासागरावीरा सुरवरा तूं एक
तरी ऐसा प्रभू समर्थ सर्वासुरवरांप्रती जैसा मघवातरी आतां कृपार्णवाग्रंथादरीं येईं कां
मागिले अध्यायीं कथनचौरंगी बैसे तपाकारणउपरी गोरक्ष मच्छिंद्रनंदनगिरनारगिरीं पोचले
पोचले परी आनंदभरितप्रेमें वंदिला मच्छिंद्रनाथपुढें पाहतांचि अत्रिसुतआनंदडोहीं बुडाला
मच्छिंद्रातें कवळूनि हदयींम्हणे माझी आलीस गे आईचक्षु मीनले तुझे ठायींमार्ग पाहें पाडसापरी
जैसें इंदूचें आगमनतिकडेचि हेलावे समुद्रजीवनतेवीं तुझे मार्गेकरुनचक्षू वेधले माझे बा
तरी आतां असो कैसेंमाझें मला भेटलें पाडसेंतरी वत्सा सांडूनि आम्हांसजाऊ नको पुढारां
ऐसी धृति वृत्ति मतीऐक्य झाली उभयव्यक्तीजैसें जळ जळाप्रतीऐक्य होय मेळवितां
मग नाना गोष्टी विचारप्रसंगतीर्थगमनादि योगसंयोगदुःखसुखादि सकळ प्रयोगएकमेकां निवेदिले
आसन वसन भोजन शयनींसदा सन्निध मच्छिंद्रमुनीजैसें अर्भका तान्हूले मनींमाय नातळती होईना
१०
ऐसे मोहाचिये परीषण्मास लोटले तैं गिरींयापरी गोरक्ष सदनांतरींतीर्थस्थानीं जल्पतसे
११
मग तो श्रीदत्ताकारणम्हणे महाराजा अत्रिनंदनतीर्थ केलें साधुदर्शनकरावया महाराज
१२
तरी आम्हां आज्ञा द्यावीआतां लंघूनि येतों महीमही धुंडाळल्या संगमप्रवाहींसाधु मिरवती महाराजा
१३
तरी याचि निमित्ताकारणेंआम्ही घेतला आहे जन्मसकळ जगाचें अज्ञानपणनिवटावया महाराजा
१४
ऐसें बोलतां गौरसुतदत्त ग्रीवा तुकावीतआणि पुढील जाणूनि भविष्यार्थअवश्य म्हणे पाडका
१५
मग परमप्रीतीं स्नेहेंकरुनबोळविता झाला उभयांकारणयेरीं उभयें करुनि नमनपर्वताखाली उतरले
१६
मार्गी चालती उभय जणपरी त्या पर्वता क्षणोक्षणपाहे मच्छिंद्रनंदनम्हणे प्राण अंतरला
१७
प्रेमाक्षु ढाळी नयनींपुढें ठेवी पदालागुनीऐसें चालतां तया अवनींदुरदुरावा पडला असे
१८
मग मार्ग धरुनि काशीपुरीचालते झाले ते अवसरींमुक्कामोमुक्काम लंघितां धरित्रीप्रयागस्थानीं पातलें
१९
तों त्या गांवीं मूर्तिमंतऔदार्यराशि प्रतापादित्यत्रिविक्रम नामें नृपनाथधर्मप्राज्ञी नांदतसे
२०
गज वाजी रथ संगतींजयाची सेना अपरिमितीतरी अधर्मनाशार्थ निगुतींसैन्यसिंधू मिरवला
२१
भद्रासनी तो राजेश्वरजयाची संपत्ति औडंबरपाहूनि लाजती अमरहा एक प्रभू म्हणती ते
२२
ऐसियेपरी राजसंपत्तीपरी उदरी नाहीं संततीतैशांत देहीं जरा निगुतीप्राप्त झाली बळत्वें
२३
परी तो राजा सुगम प्राज्ञपरोपकारी अपार ज्ञानमूर्तिमंत जयाचें संधानपाळीत असे नेटका
२४
तयाचे राज्यांत बावन्न वर्णकोणी न देखों अकिंचनसंत आलिया करिती पूजनसकळ जगीं मिरवतसे
२५
चौदा विद्यांमाजी कुशलजैसा दुसरा मूषकपाळहीनदीनांची माय कनवाळआणि काळ तत्काळ शत्रुचा
२६
सकल गृहीं देशावरत्या राजाचा परोपकारत्यामुळे मिरवती सकळ नरचिंताविरहित सुखानें
२७
असो ऐसे तेजस्थितीतया देशीं पावले निगुतीतेथें सकळ नारीनर क्षितींविजयवचनीं गर्हिवरले
२८
यापरी तयाची गृहस्वामिनीजिये मिरवती ज्ञानखाणीपतिव्रता सौदामिनीषडर्णवगुणी गुणस्वी
२९
कीं राव तो उत्तम धवळारतैं दिसती ती स्तंभाकारकीं संसारमहीचा हांकणारअनंतरुपीं नटलासे
३०
ऐसेपरी राजयुतीपरी जरा पाहूनि रायाप्रतीतेणें भयार्त होऊनि चित्तींचिंतेमाजी पडली असे
३१
म्हणे रायाचे सकळ अवसानजिंकूनि नेलें आहे जरेनेंनेणों दिवस येईल कोणसंगतीसी सोडावया
३२
ऐसीं चिंता व्यापिली चिंत्तींतों रायासी भरली आयुष्यभरतीतप्त शरीरी पाहूनि वृत्तीगमन करी परत्र
३३
प्राण सांडूनि शरीरातेंगेला असें निराळपंथेंमहीं उरलें असे प्रेतझाला आकांत राज्यांत
३४
पवित्रनामी रेवती ललनाअट्टहास करी शोकरुदनातेचि रीतीं इतर जनांदुःखप्रवाह लोटला असे
३५
आठवूनि त्रिविक्रमरायाचे गुणपरम आक्रंदती जनम्हणती पुनः या रायासमानहोणार नाहीं दूसरा
३६
ऐसे अट्टहास्यें घरोघरीं जननारीनरादि दुःखसंपन्नतये संधींत गांवी येऊननाथ तेथें पातले
३७
तें क्षेत्र महान प्रयागस्थानउभय संचरती त्याकारणतो गृहोगृहीं दुःखनिमग्नशोकाकुलित मिरवले
३८
कोणी शरीर टाकीत अवनींकोणी पडले मूर्च्छा येऊनीकोणी योजूनि हदयीं पाणीधबधबा पिटिती ते
३९
कोणी येऊनि पिशाचवतइकडून तिकडे धांव घेतअहां म्हणूनि शरीरातेंधरणीवरी ओसंडिती
४०
कोणी धरणीवरी आपटिती भाळरुधिरव्यक्त करुनि बंबाळअहा त्रिविक्रमराव भूपाळसोडूनि गेला म्हणताती
४१
ऐसियेपरी एकचि आकांतनारीनरादि बोलती समस्ततें पाहूनि मच्छिंद्रनाथपरमाचित्तीं कळवळला
४२
सहज चालतां तेथ पथठायीं ठायीं उभा राहातत्या रायाचे गुण समस्तआठवूनि रडताती
४३
धर्मज्ञानिक रायाचे गुणमोहकपणीं होतां श्रवणतंव ते वेळीं तो मच्छिंद्रनंदनमोहदरींत रिघतसे
४४
मनांत म्हणे धन्य पुरुषजयासाठीं जग पिसेंजाहलें आहे तस्मात यासराव उपकारी वहिवाटला
४५
तरी हा ऐसा भलेपणींराव मिरवला आहे अवनींतरी यातें पुनः आणोनीदेहंगत करावा
४६
ऐसें योजूनि स्वचित्तांतपाहें रायाचें आयुष्य भरततंव तो राव तितुकियांतनिरामयीं पोंचला
४७
राव नुरलासे जिवितपणींमिळाला ऐक्यें ब्रह्मचैतन्यींऐसें देखतां अजीवितपणींमग उपाय ते हरले
४८
कीं मुळींच बीजा नाहीं ठावमग रुखपत्रीं केवीं हेलावतेवीं जीवितपणीं राणीवनातुडपणीं उतलीसे
४९
मग स्तब्ध होऊनि मच्छिंद्रनंदनपरतता झाला ग्रामातूनपरी मच्छिंद्राहूनि गौरनंदनकळवळला स्वचित्तांत
५०
राज्यभागीं जगाचें बोलणेंऐकूनियां गौरनंदनानेंमोहें चित्तस्फोट होऊनअश्रु ढाळी नयनातें
५१
ऐसें स्थिती ग्रामांतूननिघते झाले उभय जणतों ग्रामाबाहेर निवांत काननींशिवालय देखिलें
५२
तें पाहूनि एकांतस्थानजाते झाले तयाकारणतों पलीकडे मोहक जनप्रेतसंस्कार मांडिला
५३
प्रेत स्कंधीं वाहूनि चतुर्थयेते झाले शिवालयांतसवें अपार जन वेष्टितशोकसिंधु उपासिती
५४
परी आकळीकपणें वंचनाशोकसिंधूची दावी भावनापरम आटूनि आपुल्या प्राणाप्रेतालागीं कवटाळिती
५५
यापरी गांवोगांवीचे जनतेही ऐकूनि वर्तमानधांव घेती आक्रोशपणेंआप्तजनांसारिखे
५६
तें पाहूनियां गोरक्षनाथपरम कळवळूनियां चित्तांतबोलतां झाला मच्छिंद्रातेंऐशा पुरुषा उठवावें
५७
मच्छिंद्र ऐकून तयाची वाणीउगाचि बैसें म्हणे तयालागुनीपरी स्थिर नोहे गोरक्षमुनीपुन्हां वागुत्तर देतसे
५८
म्हणे जरी तुम्ही न उठवाल यातेंतरी मी उठवीन स्वसामर्थ्येमच्छिंद्र म्हणे तुझें सामर्थ्यत्यास उठवावया नसे की
५९
ऐसें ऐकूनि गोरक्ष वदतम्हणे याच्यासाठी वेचीन जीवितपरी सुखी करीन सकळ जनांतेनिश्चयेंसीं महाराजा
६०
जरी न उठवें माझेनि राजातरी अग्नीत ओपीन शरीर ओजाहाचि सिद्धार्थ पण माझानिश्चयेंसीं वरिला असे
६१
जरी ऐसिया बोला संमतजरी माते न घडे नाथतरी रौरव भोगीन कोटि वर्षांतकुंभीपाक महाराजा
६२
ऐसें बोलतां दृढोत्तरवचनमग बोलता झाला मच्छिंद्रनंदनअहा वत्सा शोधाविणव्यर्थ काय वदलासी
६३
सारोखपणे केलासी पणराव उतरला जीवित्वेंकरुनब्रह्मरुपीं सनातनऐक्यरुपीं मेळ झालासे
६४
ऐसें बोलतां वसुआत्मजमग तो गोरक्षमहाराजहदयीं शोधितां तेंचि ओजलक्षापरी भासलें
६५
मग म्लान करुनि आपुलें वदनम्हणे आतां अग्नि घेईनमग प्रत्योदक तेथूनि उठूनकाष्ठांलागीं मेळविलें
६६
तें पाहूनि मच्छिंद्रनाथपरम झाला भयभीतचित्तीं म्हणे हा प्राणातेंचुकणार नाहीं द्यावया
६७
जेणें वडे आणायाकरितांचक्षु काढूनि आपुले हातातोषविली विप्रदुहितानिबरगट्ट हा असे
६८
मग पाचारुनि गोरक्षातेंबोलता झाली प्रांजळवतम्हणे बा रे सुखी करावें जनातेंयालागीं वदलासी
६९
तरी जनांचे उपकारासउदार झालासी प्राणासचित्तीं तुझे समाधानासविचार एक ऐकावा
७०
मी याचे देहस्थितहोतों रक्षाया तुझा हेतपरी बा माझिया शरीरासद्वादश वर्षे सांभाळीं
७१
द्वादश वर्षे जाहलिया पूर्णपुन्हां देहात देहांतर्गत होऊनसकळ जगाचें करुं कल्याणउपकारीं मिरवेन बा
७२
ऐसे बोलतां मच्छिंद्रनाथअवश्य गोरक्षक म्हणतमग शीघ्र सांडूनि शरीरातेंरायशरीरीं संचरला
७३
संचरला परी स्मशानहींउठोनि बैसला राजदेहींतें पाहोनियां लोक सर्वहीआनंदसरिते मिरवले
७४
जैसा पक्षियें मांडिला ठावमिरवे वृक्षा अन्य वाव तेवीं देहातें सांडूनि बरवेंरावदेहीं संचरला
७५
लोक म्हणती आम्हां प्रजेकारणमोहें वेष्टिलें हरिहरांचे मनम्हणोनि होऊनि सुप्रसन्नरायालागीं जीवविलें
७६
एक म्हणती आयुष्य होतेंकाळें हरण केलें जीवंतचुकारपणीं समजूनि मागुतेंजीवविलें रायातें
७७
असो ऐशा बहुधा प्रकरणींआनंद वदतसे जगाची वाणीमग ते परम हर्षेकरुनीस्वस्थानातें पावले
७८
विधिवत् कनकाचा पुतळा करुनस्मशानक्रिया संपादूनपाहते झाले आपुलें स्थानआप्तजनांसमवेत
७९
येरीकडे शिवालयांतसच्छिष्य महाराज गोरक्षनाथरक्षावया गुरुचें प्रेतस्थानालागीं विचारी
८०
तों तितुक्यांत आली पूजारणीहोती शैवगुरविणीतियेलागी पाचारुनीवृत्तांतातें निवेदी
८१
म्हणे माये रायाकरितांआणि प्रजेची धरुनि ममतामम गुरु मच्छिंद्र केला सरताराजदेहाकारणें
८२
तरी आतां श्रीगुरुचें प्रेतकवणा ठायीं रक्षूं यातेंजरी तुजला आहे माहीतठात मातें सांग कीं
८३
ठाव तरी म्हणसील कसागुप्त जगांत न कळे लेशापूर्ण झाली द्वादश वर्षेपुनः श्रीगुरु उठेल वो
८४
तरी तूं ठाव ऐसा मनांतसांगूनि दृढ रक्षीं प्रेतआणि स्वचित्तीं रक्षुनियां मातगुप्त जगीं वर्ते वो
८५
तरी या कर्मासी साक्षभूततुझें माझें उभय चित्तही गोष्ट कळतां जनांतपरम परम विक्षेप वाटेल गे
८६
तरी आतां चिंतार्णवींझालें कर्म वडवानलदेहींधैर्यजळाचे प्रवाहडोहींगुप्त यातें रक्षावें
८७
ऐसें बोलतां तपःप्राज्ञीअवश्य म्हणत शैवराणीमग त्या शिवालयामध्यें नेऊनीगुप्त गुहार दावीतसे
८८
तेंही गुप्त गुहार जगांतमाहीत नव्हतें किंचितार्थतें दावूनि गोरक्षनाथतुष्ट केला स्वदेहीं
८९
मग तें गुहाग्रामींचें मुखमही विदारुनि पाहे देखउत्तम ठाव लक्षूनि तेथप्रेत त्यांत ठेवीतसे
९०
प्रेत ठेवोनि गुहागृहांतमुख आच्छादिलें त्वरितात्वरितगृह लक्षूनि पुन्हां आलयांतयेवोनियां बैसला
९१
बैसे परी शैवकांताम्हणे महाराजा गोरक्षनाथाद्वादश वर्षे रक्षीन प्रेतानिश्चय त्वां केला असे
९२
केला परी बोलें शरीरकैसें राहील साचोकारएकदिन नव्हे संवत्सरद्वादश निश्चय केला असे
९३
ऐशी ऐकूनि तियेची वाणीगोरक्ष म्हणे वो शुभाननीचिरंजीवपद देहालागूनीमच्छिंद्रनाथ मिरवीतसे
९४
तरी हा देह नाशरहितआहे मायाप्रळयवंतपरी ऐसी जगांत मातप्रविष्ट न करीं जननीये
९५
ऐसें उत्तर सांगूनि तीतेंउभय चित्तीं मिरवले शांततों इकडे नृपनाथअंतःपुरीं पातला
९६
परी तो त्रिकाळज्ञानीचांचरा न घे प्रज्ञेलागुनीजेवीं माहितगार पूर्वीचें सदनींराज्यभुवनीं वर्ततसे
९७
असो गेलिया अंतःपुरांतरेवती कांता प्रज्ञावंतमंचकीं नेवोनि आपुला नाथप्रीतीं आदरें आदरिला
९८
स्नान भोजन झालियाउपरीराव बैसला मंचकावरीअंकीं बैसवोनि सदगुणालहरीअनंत वल्गने वदतसे
९९
परी जें कांता पुसे त्यातेंतेंही प्राज्ञिक प्रांजळ सांगतगुप्त प्रगटला वृत्तांतउत्तरा उत्तर देतसे
१००
व्यंगरहित बोले वचनकरी कांतेचें समाधानयावरी द्वितीय दिनीं मंगलस्नानकरुनि सभे बैसला
१०१
तेथेंही राजवैभवाकारणेंअचूक वर्ते सकळ प्रकरणींमंत्रीं आणि सकळ जनभिन्न कांहीं दिसेना
१०२
न्यायनीतीं झाला वहिवाटमाहितासमान वर्तती पाठस्नेहक्रूरता समान लोटरायासमान वर्तती
१०३
यापरी नित्य चतुर्थ प्रहरींसकळ वैभवें वना करी स्वारीशिवदर्शना ग्रामाबाहेरीत्याचि देवालय येतसे
१०४
प्रथम दिवशीं येतां रावशिवालयीं उमाधववंदितां देखोनि गोरक्ष प्राज्ञ अतीवसंपादणी पुसतसे
१०५
म्हने नाथ जी आदेशवंतकिती दिवस आलां येथकवण स्थळीं वास्तव्य करीतकवण नाम मिरवतसे
१०६
उभा राहोनि ऐसे नीतींगोरक्षातें पुसे नृपतीसंपादणी ती जगाप्रतीदृढा दावी महाराजा
१०७
परी तो चाणाक्ष गोरक्षनाथसंपादनीचें उत्तर देतमग उत्तराउत्तर करुनि महीतेंशिवालयीं संचरले
१०८
संचरले परी गोरक्षकातेंघेवोनि गेला स्वसांगातेंशिवालयीं नेमिला एकांतराव पुसे गोरक्षनाथा
१०९
हस्तसंकेतें खुणेंकरुनम्हणे देहातें बंधनसाधनकैसे रीतीं केलें रक्षणठाव लक्षोनि नेटका
११०
मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथबरबरभाषा सांगतसवें घेवोनि खूण दावीतगुहागृह रायातें
१११
असो ऐसें केलियापाठींगोरक्षें केलिया खूणदृष्टीमग क्षणें बैसोनि तळवटींराव स्थाना पैं गेला
११२
गेला परी प्रतिदिनींराव येतसे शिवभुवनींआपुला शरीरठाव लक्षोनीशिवा नमोनि जातसे
११३
क्षण एक बैसोनि गोरक्षाजवळीदावीत भक्ती प्रेमनव्हाळीआणि चित्ताची संशयकाजळीफेडूनि जात स्वस्थाना
११४
ऐसियेपरी वहिवाटतांतीन मास लोटले पंथायापरी एके दिवशीं बैसतांगोरक्षक पुसें रायातें
११५
आम्ही जातों तीर्थाटनासीआपण असावें योगक्षेमसींदृष्टी ठेवोनि स्वहितासीस्वशरीरासी रक्षावें
११६
अवश्य त्यातें भूप म्हणतस्वधर्मे ठेवूं स्वशरीरातेंआपण जावे स्वस्थचित्तेंतीर्थाटनी गमावे
११७
ऐसें वदोनि गोरक्षकातेंभूप पातला स्वस्थानातयेरीकडे गोरक्षनाथतीर्थस्थाना वहिवाटला
११८
साही लोटले षण्मासरेवती कांता रतिसुखासऋतुमंधी रेतगर्मासगरोदर पै ते झाली
११९
दिवसेंदिवस नव मासलोटोनि गेले गर्भास सुदिनदिनीं प्रसूतीसरेवती कांता होतसे
१२०
प्रसूत झाल्या मदनाकृतीबाळ पाहे माय रेवतीबाळककर्णी तेजोत्पतीबाळ दृष्टीं देखिला
१२१
त्यासी लोटले द्वादश दिवसआनंदउत्सव पालखासबाळ पहुडोनि नाम त्यासधर्मनाथ ठेविलें
१२२
त्यासही लोटली पांच वरुषेंतों एके दिवशीं शिवालयासघेवोनि पूजेचे तबकासराजा राणी पातलीं
१२३
सवे परिचारिका पंचशतलावण्यलतिका चपळवंतकीं राजार्णवींच्या लहरी अदभुतरेवतीसवें मिरवल्या
१२४
असो रेवती दासीसहितसंचरोनि शिवालयांतप्रेमें पूजीतसे उमाकांतशुद्धभावेंकरोनिया
१२५
पूजा सांग जाहलियावरीशिवा प्रार्थीतसें वागुत्तरींहे महाराज त्रिपुरारीउमापती महानुभावा
१२६
तरी ऐसें करावें कृपानिधीश्रीराया त्रिविक्रमाआधींमातें मरण देऊनि साधींसुवासिनीत्व माझें हें
१२७
ऐसें वदतां वाकसुगरिणीगदगदां हांसे शैवराणीतें रेवतीनें पाहोनिंतियेलागीं पुसतसे
१२८
म्हणे माय वो शैवदारातुज हांसूं कां आलें वागुत्तराम्हणे हास्य तव उत्तरासहज आननी आले वो
१२९
रेवती म्हणे आश्चर्येविणन यावें विकासीपणा मनतरी तूं माये प्रांजळ वचनसांग संशय सोडोनी
१३०
तंव ती बोले शैवराणीम्हणे माय वो हास्यचिन्हींतूतें वदतां कहाणीविपर्यास होईल गे
१३१
तरी माये माझें चित्तवदावया होतें भयभीतनेणो कैसी पुढील मातघडोनि येईल कर्मातें
१३२
आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थसहज कोपल्या होईल घातपतंग स्पर्शतां प्रळयानळांतजीवित्वातें उरेना
१३३
कीं केसरीगृही अन्यायकेलिया जंबुक जीवें जायकीं नगर पेटतां कोणें वांचावेंजीवित्वातें हे माते
१३४
ऐसें बोलतां शैवराणीरेवती म्हणे माय बहिणीनिर्भय होवोनि तुवां मनींरहस्यार्थ निरोपीं
१३५
राव आणि माझे कांहींभय असेल तुझे देहींतरी आम्ही सहसा कोपप्रवाहींतुजवरी न करुं
१३६
ऐसें बोलोनि करतळभावासरेवती देत शैवकांतेंससकळ हरुनि संशयासम्हणे वार्ता वद आतां
१३७
तरी ती प्रांजळ बोले वाणीमग परिचारिका बाहेर काढूनीम्हणे सांगेन वो एकांतभुवनीएकांतस्थानीं पैं गेल्या
१३८
एकांतालया गेलियावरीबोलती झाली शैवनारीम्हणे माये तूं सुवासीण स्वदेहीकांही नाहींस जाण पां
१३९
राव त्रिविक्रम मृत्यु पावलातयाचे देही मच्छिंद्र संचरलाआपला देह येथें सांडिलाशिवालयामाझारीं
१४०
मग तयाचा शिष्य गोरक्षनाथगुहागृहा ठेवूनि गेला प्रेतद्वादश वर्षे नेमस्तनेम केला उभयतांनीं
१४१
द्वादश वर्षे सरल्या शेवटींमच्छिंद्र वर्तेल स्वदेहराहाटीऐसिये कथा माझिये दृष्टीझाली असे जननीये
१४२
तरी तुज वैधव्यपणअसोनि बोलसी सुवासिणम्हणोनि हास्य आलें मजलागूनजाण जननी निश्चयें
१४३
ऐसें ऐकुनि रेवती सतीम्हणे दावीं कां मच्छिंद्रप्रेताप्रतीयेरी अवश्य म्हणोनि उक्तीगृहेमध्यें नेतसे
१४४
म्हणे माय वो येचि ठायींआच्छादिला मच्छिंद्रदेहींतरी मही विदारुनि गुहागृहींनिजदृष्टीनें पाहें कां
१४५
ऐसें बोलोनि दावोनि तीतेंशिवालयीं गेली त्वरितयेरीकडे संशयवंतरेवती स्थाना गेलीसे
१४६
गेलीसे परी एकांतासींविचार करी आपुले मानसींचित्तीं म्हणे पतिव्रतानेमासीदैवेंकरुनि नांडिले
१४७
नाहिसें परी संचितार्थघडणार घडूनि आलें निश्चितपरी पुढती आपुलें हितविलोकावें आपणचि
१४८
पति निवर्तल्यापाठींलाधली मच्छिंद्रवीर्यकोटीपरी पाहतां पातकदृष्टींवंशवेली दिसेना
१४९
पूर्वी भरतवंश काढूनव्यासवीर्ये केला उत्पन्नत्याही पुढें कुंतीरत्नत्याच नीतीं आचरली
१५०
पंचदेवाचें वीर्य घेवोननिर्माण केले पांचहि जणतस्मात् वंशवेलीकारणेंशिष्टदेह अर्पावा
१५१
तरी हा विचार पातकरहितघडोनि आला यत्नातीतपरी द्वादश वर्षे होतां भरितपुन्हां अनर्थ होईल हा
१५२
मच्छिंद्र जाईल स्वदेहाकारणेंसुत धर्मनाथ अति सानराज्यवैभवीं आसरा धरोनकवण रतीं राहील कीं
१५३
त्रिविक्रमदेहीं तपोबलआहे म्हणूनि विवतें बाळतो गेलिया सावली शीतळमजलागीं मिळेना
१५४
तरी आतां करावें कैसेंदृष्टीं पाहें मच्छिंद्रदेहासदृष्टीं पाहिल्यावरी विनाशकरोनियां सांडावा
१५५
देह झालिया छिन्नभिन्नमग कैसा संचरेल मच्छिंद्रनंदनमुळींच बीज केलिया भस्मबाहेर कांहीं उगवेना
१५६
ऐसा विचार करुनि चित्तींएक परिचारिका घेवोनि सांगातीगांवाबाहेर मध्यरात्रींयेवोनियां पोंचली
१५७
आणिक एक गुप्तराहाटीदोन सबळ घेतले होते कामाठीत्वरें येऊन्नि शिवालयापाठींगुहाद्वार विदारिलें
१५८
मोकळें केलें गुहाद्वारकरिते झाले आंत संचारजातांचि तें कलेवरमच्छिंद्राचें देखिलें
१५९
परी तें कलेवर तेजःपुंजकीं सजीवपणीं दिसे सहजमाणिकवर्णी सविताराजतियेलागी भासलें
१६०
असो ऐसिये तेजोराशीमग शस्त्र घेवोनि अस्थिमांसासीरती रती छेदोनियां तयासीबाहेर तई काढिलें
१६१
मग भाग टाकोनि कान नांतविखरुनि दिधले पृथक् पृथक् तेथतरी समान रज समस्तठाई ठाई टाकिले
१६२
टाकिले परी पातळपणीरजरजाची होय मिळवणीऐशापरी त्यासी करुनीस्वस्थानीं गेली ते
१६३
गुहागृहाचें मुख आच्छादूनजैसें होतें तैसे करुनयेरी घडल्या कारणउमा जागृत झालीसे
१६४
मग प्रत्यक्ष होऊनि बोलतम्हणे महाराजा कैलासनाथाजागृत व्हावें विपरीतपंथाअघटित झालें महाराजा
१६५
तुमचा मच्छिंद्रनंदनगेला आहे स्वदेह सांडूनपरी रेवतीदारा येऊनविध्वंसिलें शरीरासी
१६६
ऐसी ऐकतां उमेची मातखडबडूनि उठला कैलासनाथहदयीं पाहे तों विपरीतमच्छिंद्रदेही वर्तलें
१६७
मग अंबेसी बोलता झाला शिव वचनम्हणे माझा आज गेला प्राणपरी उमे यक्षिणी बोलावूनसकळ शरीर वेंचीं कां
१६८
अस्थि त्वचा मांसासहितरती रती भाग वेंचूनि समस्तएकत्र करुनि कैलासांतयक्षिणीहस्तीं पाठवीं
१६९
अवश्य म्हणूनि नगात्मजायक्षिणी पाचारी विजयध्वजाकोटी चामुंडा विभागकाजामहीलागीं उतरल्या
१७०
त्यांतें पाहूनि माय भवानीयेतांचि सांगे कार्यालागुनीमच्छिंद्रशरीर समस्त वेंचोनीस्वर्गा न्यावें म्हणतसे
१७१
कैलासगिरी शिवगण बहुतत्यांत वीरभद्र मम सुततयाहातीं ओपोनि समस्त प्रेतरक्षण दृढ सांगावें
१७२
ऐसें सांगूनि क्षणिक वार्तमहीं संचरल्या मांसशोधार्थासकळ शरीर वेंचूनि तत्त्वतांकैलासभुवनीं चालिल्या
१७३
कोटी चामुंडा प्रतापवंतयक्षिणीसह झाल्या स्वर्गस्थितकैलासगिरीं मग जातवीरभद्रातें निवेदिलें
१७४
म्हणती परम हर्षेकरुनीहे महाराज शिवगणीराजेश्वर भद्रासनीवृत्तांतातें ऐकावें
१७५
आमचा तुमचा शत्रु पूर्णअवचट पावला आहे मरणरती रती देहाचे भाग जमवूनआम्हीं आणिले महाराजा
१७६
तरी तो शत्रु म्हणशील कोणया भूमंडळा मच्छिंद्रनंदनत्यानें आम्हांसी नग्न करुनपरम लज्जे विटंबिलें
१७७
अष्टभैरव पाहोनि धरणींविटंबिलें दशा करुनिरुधिरपूर लोटूनि अवनींविगतकळा वरियेली
१७८
आणि तुम्हांसवें घेतले कटकमौळीं पर्वत देऊनि देखवायुसुत करुनि आदिकविटंबिले महाराजा
१७९
सकळ देवांचा शत्रु कुजातबरा दैवें पावला घाततरी आतां प्रतापवंतदृढोत्तरीं शरीर रक्षावें
१८०
या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्षतो परम प्रतापवंत दक्षतो जिंकूनि नेईल शरीर प्रत्यक्षतरी सावध राहावें
१८१
सहजस्थितीतें दैवेंकरुनशत्रु पावला आहे मरणहालावांचूनि फेडविलें हर्षेकरुनतुम्हां आहां दैवानें
१८२
ऐसें सांगूनि हर्षयुक्तपरी वीरभद्र तोषला आपुले चित्तांतमग भैरवादि समस्तअहा अहा म्हणताती
१८३
मग चौर्याूयशी कोटी बहात्तर लक्षशिवगण प्रतापी महादक्षमच्छिंद्रशरीर वेष्टूनि प्रत्यक्षरक्षणार्थ बैसविले
१८४
कोटी यक्षिणी चामुंडांसहितडंखिनी शंखिनी पातल्या समस्तअस्त्रशस्त्रादि होऊनि उदितरक्षण करिती शरीराचें
१८५
येरीकडे त्रिविक्त्रमदेहातप्रतापशीळ जो मच्छिंद्रनाथनित्य येऊनि शिवालयांतगुहागृहीं लक्षीतसे
१८६
परी तो ठाव जैसा तैसादिसुनि येत दृष्टिभासामग स्वस्थ भोगी संपत्तिविलासाराज्यासनीं बैसूनियां
१८७
परी शरीरा झाला जो प्रयासहें माहीत नव्हतें कांहीं देहाससदा भोगी संपत्तिविलासराजभुवना जातसे
१८८
ऐसे नित्य राजविलासलोटूनि गेलीं वर्षे द्वादशतों येरीकडे तीर्थाटनासगोरक्ष सावध झाला असे
१८९
तरी तो गोरक्ष पुढील अध्यायींकाय करील तो प्रतापप्रवाहींतरी श्रोते अवधान देहींसिद्ध करा पुढारी
१९०
अवधान पाहूनि अर्थ बहुतकथा वदेल धुंडीसुतमालू नरहरीचा शरणागतदास संतांचा असे कीं
१९१
स्वस्तिश्री ग्रंथ भक्तिसारसंमत गोरक्षकाव्य किमयागारसदा परिसोत भाविक चतुरद्वात्रिंशति अध्याय गोड हा
१९२

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ नवनाथभक्तिसार द्वात्रिंशतिअध्याय समाप्त ॥

॥ श्री नवनाथाय नमः ॥

या अध्यायाचे वाचन झाले?

तुमची नोंद या ब्राउझरमध्ये जतन होते.